शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Child Marriages in India: धक्कादायक! भारतात २२ कोटी 'बालिका वधू', गेल्या २ वर्षांत प्रचंड वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2022 18:23 IST

५ वर्षांत जवळपास ३ पटीने वाढली नोंदणीकृत बालविवाहांची संख्या

Child Marriages in India: भारतात गेली कित्येक वर्षांपासून बालविवाहाच्या विरोधात जनजागृती केली जात आहे. पण असे असले तरी भारतातील बालविवाह अजूनही पूर्णपणे बंद झालेले नाही. भारतात लग्नाचे कायदेशीर वय मुलींसाठी १८ वर्षे आणि मुलांसाठी २१ वर्षे आहे. पण असे असले तरी भारतात अनेक ठिकाणी अजूनही बालविवाह केला जात असल्याचे ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. भारतात नोंदणीकृत बालविवाहांची संख्या ५ वर्षांत जवळपास ३ पटीने वाढली आहे. भारतात २२ कोटींहून अधिक वधू अशा आहेत, ज्यांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे.

लग्नासाठी अपहरण करून नेण्यात येणाऱ्या मुलींपैकी भारतात दररोज सरासरी ३५ मुलींची सुटका केली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या आकडेवारीनुसार, २०१२ ते २०२१ या १० वर्षांमध्ये बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत ४.५ हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. आश्‍चर्यकारक बाब म्हणजे २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत कोरोनाचे १८०० हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.

कशामुळे चर्चेत आला बालविवाहाचा मुद्दा?

लग्नासाठी वेगवेगळ्या धर्मांच्या वैयक्तिक कायद्यांमध्ये कायदेशीर वय भिन्न आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानुसार, एखाद्या मुलीचे वय १५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर ती स्वतःच्या इच्छेने लग्न करू शकते. अशाच एका मुस्लिम मुला-मुलीच्या लग्नाचे प्रकरण उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. हे संपूर्ण प्रकरण १६ वर्षीय मुलगी आणि २१ वर्षीय मुलाच्या लग्नाशी संबंधित आहे. दोघेही मुस्लिम असून दोघांनीही स्वतःच्या इच्छेने लग्न केले. मात्र मुलीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला असल्याने हे प्रकरण पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात पोहोचले.

यावर्षी १३ जून रोजी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने या लग्नाला मान्यता दिली. उच्च न्यायालयाने म्हटले की, मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार, मुलगी शारीरिकदृष्ट्या अशा स्थितीत आहे की तिला लग्न करण्याचा अधिकार आहे. नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. NCPCR ने आपल्या याचिकेत असा युक्तिवाद केला की उच्च न्यायालयाचा निर्णय बालविवाहाला परवानगी देणारा होता आणि 2006 च्या बालविवाह प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करणारा होता. हा कायदा धर्मनिरपेक्ष असून सर्व धर्मांना लागू होतो, असेही याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालय ठरवले जाणार आहे की १६ वर्षांची मुलगी आणि २१ वर्षांच्या मुलाचा विवाह वैध ठरवण्यात यावा किंवा नाही? या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात ७ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.

बालविवाहाबाबत कठोर कायदा, तरीही प्रकरणांत वाढ

बालविवाह दीर्घकाळापासून सुरू असलेली गोष्ट आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये, मुलगा आणि मुलगी दोघेही लग्नासाठी निश्चित केलेल्या वयापेक्षा कमी असतील, तर तेव्हा त्याला बालविवाह मानले जाते. भारतात लग्नाचे कायदेशीर वय निश्चित करण्यात आले आहे. भारतात स्वातंत्र्यापूर्वी बालविवाहाबाबत कायदा होता. यासाठी १९२९ मध्ये कायदा करण्यात आला. तेव्हा लग्नासाठी मुलांचे वय १८ वर्षे आणि मुलींचे १४ वर्षे निश्चित करण्यात आले. पुढे १९७८ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली आणि मुलांचे कायदेशीर वय २१ वर्षे आणि मुलींचे वय १८ वर्षे करण्यात आले. पण असे असूनही अनेक ठिकाणी या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :marriageलग्नIndiaभारतMuslimमुस्लीमSupreme Courtसर्वोच्च न्यायालय