शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

चुरशीच्या लढतीत शिवसेनेची............ जोड

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.

मंचर शहरातील समस्या सोडविण्याचे आवाहन नवीन सरपंचांपुढे असणार आहे. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. आता अस्तित्वात असणारी पाणीपुरवठा योजना जरी नव्याने करण्यात आली असली, तरी आताच पाणीपुरवठा कमी पडू लागला आहे. शहराचा चोहोबाजूंनी विस्तार वाढतो. शिवाय दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजना अस्तित्वात आणावी लागेल. पुढील पंचवीस वर्षांत शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता तसे नियोजन करावे लागेल. राजकीय नेतृत्वाने त्याची दखल यापूर्वीच घेतलेली दिसते. मात्र आता नव्याने निवडून आलेल्या सरपंचांना नवीन पाणीपुरवठा योजना लवकरच अस्तित्वात येण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.
बसस्थानकावर एक सुलभ शौचालय व शहरातील मोजक्या ठिकाणी असणार्‍या मुतार्‍या वगळता स्वच्छतागृहे कोठेच नाहीत. त्यातही महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. शहरात आता सार्वजनिक जागा फारशा राहिलेल्या नाहीत, मात्र तरीही भविष्यात स्वच्छतागृहे उभारावी लागतील. अर्थात ग्रामपंचायत प्रशासनाला निधी देण्यास काही मर्यादा आहेत. कचराप्रश्नही सोडवावा लागेल. शहरातील कचरा उचलून अण्णासाहेब आवटे महाविद्यालयाच्या मागे असणार्‍या डोंगरावर टाकला जातो. पूर्वी तो शिंदेवाडी गावच्या हद्दीत टाकला जायचा. मात्र ग्रामस्थांनी त्यास तीव्र विरोध केला. शिंदेवाडीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने आता हा कचरा अलीकडे टाकला जातो.
भविष्यात या भागात बांधकामक्षेत्र वाढीस लागेल. त्या वेळी कचरा टाकायचा कुठे हा प्रश्न निर्माण होणार आहे. नव्याने निवड झालेल्या सरपंच गांजाळे यांना प्रश्न आत्ताच लक्षात घ्यावे लागणार आहेत. शहरात बांधकामे मोठ्या प्रमाणात होत असताना त्याची नोंद करण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला नाही. छोट्या वस्त्यांवरील रस्त्यांना प्राधान्य द्यावे लागेल. शहरातील काही रस्त्यांची कामे झाली. त्या वेळी अतिक्रमणे काढण्यात आली. या व्यावसायिकांची पुनर्वसन करण्याची मागणी आहे. रस्त्याला भरणारा आठवडे बाजार इतरत्र हलविण्याच्या सूचना आहेत. त्यावर उपाययोजना कराव्या लागतील.
लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या स्मारकाचा मुद्दा प्राधान्याने हाती घ्यावा लागेल. ग्रामपंचायतीच्या उत्पन्नवाढीवर भर दिला पाहिजे. अर्थात गावाचा विकास करताना लोकप्रतिनिधींशी संपर्क ठेवून जास्तीत जास्त निधी आणावा लागेल. शहराचा विकास आराखडा बनविला तर विकासकामे अधिक गतीने होतील.