शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:17 IST

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडूनही बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही. आम्हाला वाटेल, तेव्हा आम्ही मुंबईत परत येऊ. हा सगळा खटाटोप शिवसेना वाचवण्यासाठी आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावर बोलताना, आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जात नाही. १२ आमदारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो पूर्णपणे बेकायदा आहे. पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिला नाही, केवळ या कारणामुळे कोणावरही निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही किंवा त्यांना अयोग्य घोषित करणे चुकीचे आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. 

आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि घाबरण्याचे कारण नाही

शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले होते. यावर बोलताना, कोणती किंमत चुकवावी लागेल, असा उलटप्रश्न करत, तुम्ही ज्या चुका करून ठेवल्या आहेत, त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही शिवसेनेला बर्बाद करताय, असा आमचा आरोप आहे. यावर, कोणावर आरोप करताय, या प्रश्नावर टीव्ही येऊन जे बोलत असतात, तुम्ही सगळे पाहता. तुम्हीच जाऊन मुलाखती घेत असता, असे ते म्हणाले

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात 

यानंतर थेट संजय राऊत यांचे नाव घेऊन प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात. ते सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील, याचा काही नेम नाही. त्याचा पत्ता कोणालाही लागत नाही आणि काय बोलतात हेही समजत नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला. शिंदे गटाच्या रणनीतिबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होतो, तेव्हा आमची विचारसरणी, धोरण संपवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शिरसाट यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना