शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

“कुणालाही घाबरत नाही, आम्ही शिवसेना वाचवण्याचे प्रयत्न करतोय”; संजय शिरसाट यांचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 16:17 IST

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला.

गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेच्या प्रमुख फळीतील नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेसह महाविकास आघाडीसाठी हा एक मोठा भूकंप मानला जात आहे. यानंतर आता शिवसेना, पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गट यांतील संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांकडूनही बाजू मांडण्यास सुरुवात झाली आहे. यातच आता संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे. आम्ही कुणालाही घाबरत नाही. आम्हाला वाटेल, तेव्हा आम्ही मुंबईत परत येऊ. हा सगळा खटाटोप शिवसेना वाचवण्यासाठी आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले.

शिवसेनेच्या १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे. यावर बोलताना, आम्हाला घेरण्याचा प्रयत्न केला जात नाही. १२ आमदारांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातोय, तो पूर्णपणे बेकायदा आहे. पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहिला नाही, केवळ या कारणामुळे कोणावरही निलंबनाची कारवाई होऊ शकत नाही किंवा त्यांना अयोग्य घोषित करणे चुकीचे आहे, असे संजय शिरसाट यांनी नमूद केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना संजय शिरसाट यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. 

आम्ही कुणालाही घाबरत नाही आणि घाबरण्याचे कारण नाही

शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना बंडखोरांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे म्हटले होते. यावर बोलताना, कोणती किंमत चुकवावी लागेल, असा उलटप्रश्न करत, तुम्ही ज्या चुका करून ठेवल्या आहेत, त्या सुधारण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आम्हाला शिवसेना वाचवायची आहे, त्यासाठीच आमचे प्रयत्न सुरू आहेत. तुम्ही शिवसेनेला बर्बाद करताय, असा आमचा आरोप आहे. यावर, कोणावर आरोप करताय, या प्रश्नावर टीव्ही येऊन जे बोलत असतात, तुम्ही सगळे पाहता. तुम्हीच जाऊन मुलाखती घेत असता, असे ते म्हणाले

संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात 

यानंतर थेट संजय राऊत यांचे नाव घेऊन प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा संजय राऊत सकाळी उठून काही बोलत असतात. ते सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील आणि संध्याकाळी काय बोलतील, याचा काही नेम नाही. त्याचा पत्ता कोणालाही लागत नाही आणि काय बोलतात हेही समजत नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी लगावला. शिंदे गटाच्या रणनीतिबाबत बोलताना ते म्हणाले की, आम्ही शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जात आहोत. आम्ही महाविकास आघाडीत काँग्रेस राष्ट्रवादीसोबत होतो, तेव्हा आमची विचारसरणी, धोरण संपवण्याचे काम त्यांनी केले. बाळासाहेबांचे विचार संपवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका शिरसाट यांनी केली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना