शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

“आपल्याकडे आरोपीलाही बाजू मांडायची संधी दिली जाते, आम्हाला तीही देण्यात आली नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2021 6:59 PM

विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करत १२ खासदारांवरील निलंबनाच्या कारवाईचा निषेध करण्यात आला आहे.

नवी दिल्ली:संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून, पहिल्याच दिवशी राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी १२ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात घातलेल्या गोंधळामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निलंबित खासदारांना अधिवेशनात सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सीपीआय, सीपीएम आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे. यावर शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आपल्या देशात आरोपीलाही आपली बाजू मांडायची संधी दिली जाते. आम्हाला तीही देण्यात आली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याने राज्यसभेच्या एकूण १२ सदस्यांना निलंबित करण्यात आले. ही कारवाई हिवाळी अधिवेशनासाठी करण्यात आली आहे. त्यामुळे १२ खासदारांना संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाही. या निलंबित करण्यात आलेल्या १२ खासदारांमध्ये अनिल देसाई आणि प्रियांका चतुर्वेदी या शिवसेनेच्या दोन खासदारांचा समावेश असून, या कारवाईवर बोलताना चतुर्वेदी यांनी जोरदार आक्षेप नोंदवला

आपल्या देशात आरोपीलाही बाजू मांडण्याचा हक्क 

आपल्या देशात आरोपीलाही बाजू मांडण्याचा हक्क आहे. जिल्हा न्यायालयापासून ते अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत आरोपीचे म्हणणे ऐकून घेतले जाते. त्याच्यासाठी वकील उपलब्ध करून दिला जातो. गरज पडल्यास सरकारी अधिकारीही तिथे आपली भूमिका मांडतात. एकीकडे आरोपीला असे अधिकार असताना आम्हाला मात्र ती संधीही दिली गेली नाही. आमची बाजू न ऐकताच कारवाई करण्यात आली, या शब्दांत प्रियंका चतुर्वेदी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

पुरुष मार्शलची महिला खासदारांना मारहाण

राज्यसभेतील ज्या घटनेवरून ही कारवाई करण्यात आली त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. ते फुटेज पाहिल्यास पुरुष मार्शल महिला खासदारांना मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. असे असतानाही कारवाई आमच्यावर करण्यात आली. ही कारवाईच असंसदीय आहे, असा दावा चतुर्वेदी यांनी केला आहे. तसेच काँग्रेस सदस्य रिपुन बोरा यांनीही ही कारवाई म्हणजे लोकशाही आणि संविधानाची हत्या असल्याचा आरोप केला.

दरम्यान, विरोधी पक्षांनी संयुक्त निवेदन जारी करत १२ खासदारांवरील निलंबनाच्या कारवाईचा निषेध केला. ही कारवाई चुकीची आणि लोकशाहीवर आघात करणारी असून आम्ही याचा निषेध करत आहोत, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ११ ऑगस्ट रोजी विमा विधेयकावर चर्चा सुरू असताना राज्यसभेत प्रचंड गोंधळ झाला. प्रकरण शांत करण्यासाठी मार्शल्स बोलावण्याची वेळ आली. सभागृहात घडलेल्या घटनांमुळे लोकशाहीचे मंदिर अपवित्र झाल्याचे राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी त्यावेळी म्हटले होते. या गोंधळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील कामकाज स्थगित करण्यात आली.  

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाShiv Senaशिवसेना