शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:35 IST

केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

ठळक मुद्दे केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे.राऊत म्हणाले, फिल्म इंडस्ट्री 100 वर्ष जुनी आहे. मात्र, येथे असुरक्षित वाटते, असे आजवर कुणीही म्हटले नाही. यापूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते.

मुंबई -शिवसेना नेते संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यातील वाद वाढतच चालला आहे. आता संजय राऊत यांनी कंगनाला 'नॉटी गर्ल' असे म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना संजय राऊतांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत केंद्रावरही निशाणा साधला आहे. 

केंद्र सरकारने कंगनाला सुरक्षा व्यवस्था पुरवल्यावरून राऊत म्हणाले, महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले. मुंबई पोलिसांमुळेच बॉलीवुडमधील अंडरवर्ल्डचा खात्मा झाल्याचेही ते म्हणाले.

मुंबई पोलिसांनीच मुंबई अंडरवर्डपासून मुक्त केली -शिवसेना नेते राऊत म्हणाले, फिल्म इंडस्ट्री 100 वर्ष जुनी आहे. मात्र, येथे असुरक्षित वाटते, असे आजवर कुणीही म्हटले नाही. एका मुलीच्या बोलण्यावरून मुंबई पोलीस वाईट होत नाहीत. मुंबई पोलिसांनीच शहर अंडरवर्ल्डपासून मुक्त केले आहे. 

'माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला -यापूर्वी संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते.  आता यावर स्पष्टिकरण देताना, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो.

महाराष्ट्र सरकार कंगना विरोधात, केंद्रानं दिलं संरक्षण -मुंबईत असूरक्षित वाटते, अशा आशयाच्या कंगनाच्या वक्तव्यानंतर, कंगनाने मुंबई पोलिसांप्रती अविश्वास दाखवल्यामुळे आणि त्यांची बदनामी केल्यामुळे, तिला येथे राहण्याचा कसलाही अधिकार नाही, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. 

कंगनाला Y दर्जाची सुरक्षा -मुंबई पोलिसांसंदर्भातील वक्तव्य आणि त्यावरून सुरू झालेल्या वादानंतर आता, केंद्र सरकारने कंगनाच्या संरक्षणात वाढ केली आहे. आता कंगनाला Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर अविश्वास व्यक्त केला होता. यानंतर तिला मुंबईत येण्यासंदर्भात धमक्या दिल्या गेल्या होत्या. यासंर्व पार्श्वभूमीवर कंगनाच्या वडिलांनी हिमाचल पोलिसांकडे कंगनाच्या सुरक्षिततेसंदर्भात मागणी केली होती. कंगना ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे. हिंमत असेल तर मला अडवून दाखवा, असे थेट आव्हान तिने शिवसेनेला दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या -

BMCचे लोक माझ्या कार्यालयात घुसले, उद्या तोडायची तयारी; व्हिडिओ दाखवत कंगनाचा दावा

CoronaVaccine : खूशखबर! स्वदेशी 'कोव्हॅक्सीन'च्या दुसऱ्या टप्प्यावरील परीक्षणाला परवानगी, 7 सप्टेंबरपासून होणार सुरूवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

कंगनाविरोधात आंदोलन, शिवसेनेच्याच राज्यात शिवसेनेच्या आमदारावर गुन्हा दाखल

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKangana Ranautकंगना राणौतbollywoodबॉलिवूडShiv Senaशिवसेना