शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

...ही वेडी आहे, हिच्या मागून चालतो भूतांचा तांडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:48 IST

हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे.

फरीदाबाद - हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती स्वत: अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी प्रत्येक आमावास्येला हरिद्वारला जाते. ती स्वत: जाते कारण ते सर्व मृतदेह बेवारस असतात. कुणीही यांची जबाबदारी घेत नसते. पूजा मूळच्या दिल्लीत राहत होत्या. परंतु, सध्या त्यांनी आता मुक्काम फरीदाबादला हलविला आहे. 

मार्च २०२२ मध्ये त्यांच्या सख्ख्या भावाला कुणीतरी गोळी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हे समजताच धक्क्याने वडील कोमात गेले होते. पूजाने आसपासच्या अनेकांना भावांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करा म्हणून विनंती केली परंतु कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे अखेर पूजाने स्वत: स्मशानभूमीत जाऊन भावावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिला बेवारस मृतदेहांची समस्या किती गंभीर असते, याची कल्पना आली वतिने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था) 

कोण पुरवतो पैसे?- यासाठी येणारा खर्च पूजा स्वत: करते. पूजाचे आजोबा सैन्यात होते. ते शहीद झाल्यानंतर घरच्यांना पेन्शन मिळते.- त्यातील काही पैसे आजी पूजाला अंत्यसंस्काराच्या कामासाठी देत असते. पूजाचे वडीलही दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी करतात. - तिचे वडीलही पूजाला या कामासाठी दर महिना १० ते १५ हजारांची मदत करतात. पूजा दररोज १२ ते १५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते. बेवारस मृतदेह आढळला की हॉस्पिटलमधून पूजाला फोन येतात. 

हल्ल्यात पाय फ्रॅक्चर सध्या मित्र परिवार पूजाला मदत करीत असतो. परंतु, सुरुवातीला स्थिती अशी नव्हती. लोकांनी तिला खूप टोमणे मारले. या मुलीला वेड लागले आहे, असाही प्रचार काही जणांनी सुरू केला होता. ही मुलगी चालते तेव्हा तिच्या मागून भूतांचा तांडा चालत असतो, असेही लोक एकमेकांना सांगत असत. काही लोकांना पूजाचे हे काम अजिबात रुचले नाही. त्यामुळे त्यांनी पूजावर हल्लाही केला होता. त्यात पूजाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. या घटनेनंतरही पूजा खचली नाही. जोवर मी जिवंत आहे तोवर हे काम करीतच राहणार, असा पूजाचा निर्धार आहे.

टॅग्स :HinduहिंदूSocialसामाजिक