शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

...ही वेडी आहे, हिच्या मागून चालतो भूतांचा तांडा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 09:48 IST

हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे.

फरीदाबाद - हिंदू धर्मात महिला किंवा मुलींनी स्मशानभूमीवर जाणे अशुभ मानले जाते. असे कृत्य कुणी केल्यास त्या व्यक्तीवर सर्व स्तरांमधून टीका केली जाते. परंतु, टीकेची पर्वा न करता फरीदाबादमध्ये राहणारी २६ वर्षांची पूजा यादव या तरुणीने आतापर्यंत ४ हजारांहून अधिक मृतदेहांना स्मशानभूमीत अग्नी दिला आहे. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ती स्वत: अस्थींचे गंगेत विसर्जन करण्यासाठी प्रत्येक आमावास्येला हरिद्वारला जाते. ती स्वत: जाते कारण ते सर्व मृतदेह बेवारस असतात. कुणीही यांची जबाबदारी घेत नसते. पूजा मूळच्या दिल्लीत राहत होत्या. परंतु, सध्या त्यांनी आता मुक्काम फरीदाबादला हलविला आहे. 

मार्च २०२२ मध्ये त्यांच्या सख्ख्या भावाला कुणीतरी गोळी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. हे समजताच धक्क्याने वडील कोमात गेले होते. पूजाने आसपासच्या अनेकांना भावांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी मदत करा म्हणून विनंती केली परंतु कुणीही पुढे आले नाही. त्यामुळे अखेर पूजाने स्वत: स्मशानभूमीत जाऊन भावावर अंत्यसंस्कार केले. त्यावेळी तिला बेवारस मृतदेहांची समस्या किती गंभीर असते, याची कल्पना आली वतिने अशा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. (वृत्तसंस्था) 

कोण पुरवतो पैसे?- यासाठी येणारा खर्च पूजा स्वत: करते. पूजाचे आजोबा सैन्यात होते. ते शहीद झाल्यानंतर घरच्यांना पेन्शन मिळते.- त्यातील काही पैसे आजी पूजाला अंत्यसंस्काराच्या कामासाठी देत असते. पूजाचे वडीलही दिल्ली मेट्रोमध्ये नोकरी करतात. - तिचे वडीलही पूजाला या कामासाठी दर महिना १० ते १५ हजारांची मदत करतात. पूजा दररोज १२ ते १५ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करते. बेवारस मृतदेह आढळला की हॉस्पिटलमधून पूजाला फोन येतात. 

हल्ल्यात पाय फ्रॅक्चर सध्या मित्र परिवार पूजाला मदत करीत असतो. परंतु, सुरुवातीला स्थिती अशी नव्हती. लोकांनी तिला खूप टोमणे मारले. या मुलीला वेड लागले आहे, असाही प्रचार काही जणांनी सुरू केला होता. ही मुलगी चालते तेव्हा तिच्या मागून भूतांचा तांडा चालत असतो, असेही लोक एकमेकांना सांगत असत. काही लोकांना पूजाचे हे काम अजिबात रुचले नाही. त्यामुळे त्यांनी पूजावर हल्लाही केला होता. त्यात पूजाच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. या घटनेनंतरही पूजा खचली नाही. जोवर मी जिवंत आहे तोवर हे काम करीतच राहणार, असा पूजाचा निर्धार आहे.

टॅग्स :HinduहिंदूSocialसामाजिक