शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 15:23 IST

Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: युद्धविरामबाबत शशी थरुर यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली असून, सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीनंतर राजकीय वातावरण तापले आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने युद्धविराम झाल्यामुळे अनेक विरोधी नेते सरकारवर टीका करत आहेत. काँग्रेस नेते तर 1971चे युद्ध आणि आताच्या संघर्षाची तुलना करत माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या दरम्यान काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी मात्र संतुलित भूमिका घेतली आहे. 

1971 आणि आताची परिस्थिती वेगळीमीडियाशी संवाद साधताना शशी थरुर म्हणाले की, '1971 आणि 2025 ची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. सध्या भारतासाठी शांतता आणि स्थैर्य हे प्राथमिक उद्दिष्ट असले पाहिजे. यावेळी भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी कारवाई केली होती, जी आता पूर्ण झाली आहे. आता उगीच युद्ध चालू ठेवण्यात अर्थ नाही. भारताने आपल्या आर्थिक प्रगतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित करावे आणि दीर्घकालीन युद्धात अडकू नये.'

थरुर पुढे म्हणतात, '1971 च्या युद्धाचे एक नैतिक उद्दिष्ट होते. ते युद्ध बांग्लादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढले गेले होते. त्यावेळी भारत नागरिकांच्या स्वातंत्र्यासाठी लढत होता. आज परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तानची लष्करी भूमिका, तांत्रिक क्षमता आणि धोरणात्मक विचारसरणी बदलली आहे. आता पाकिस्तानसोबत दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवले, तर दोन्ही बाजूने मोठी जीवित आणि वित्तहानी होईल. आजच्या भारताला फक्त सूड हवा नाही तर स्थिरता हवी आहे,' असेही ते यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाShashi Tharoorशशी थरूरBJPभाजपाcongressकाँग्रेस