शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

शांतीदेव यांनी बुद्धाचे तत्त्वज्ञान समजावून सांगितले

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

- डॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला

- डॉ. वांगचूक दोरजी नेगी : बुद्ध महोत्सवातील रत्नावली व्याख्यानमाला
नागपूर : शांतीदेव यांनी केलेली साधना समाजाला एक नवी दिशा देणारी होती. प्रत्येक धर्म, जातीतील लोकांची मानसिकता सकारात्मक करण्याचे काम त्यांनी बुद्ध धम्माच्या माध्यमातून केले. भगवान बुद्धाचे तत्त्वज्ञान त्यांनी आत्मसात केले आणि त्यांनी तळागाळातल्या लोकांपर्यंत ते सहजपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकालाच सुख हवे असते पण सुख आणि दु:ख आपली मानसिकताच ठरवित असते. हे त्यांनी समजावून सांगितले आणि लोकांना जगण्याचा मंत्र दिला, असे मत सारनाथ, वाराणसी येथील डॉ. वांगचुक दोरजी नेगी यांनी व्यक्त केले.
पवित्र दीक्षाभूमी येथे आयोजित बुद्ध महोत्सवात रत्नावली व्याख्यानमालेत आचार्य शांतीदेव यांच्या जीवनचरित्रावर ते बोलत होते. आयुष्यात दु:खी कुणीच होऊ इच्छित नाही. पण खरे सुख मिळविण्यासाठी महापुरुषांचे चरित्र समजून घेतले पाहिजे. प्रयास केला तर आपणही आपली मानसिकता बदलू शकतो. त्यासाठी प्रयत्नात सातत्य असले पाहिजे. प्रत्येकातच बुद्ध होण्याची क्षमता आहे पण आपण आपली ताकद ओळखत नाही. शांतीदेवानी ही क्षमता ओळखली आणि ते बुद्ध झाले. त्यासाठी बुद्धाजवळ आपले मन एकाग्र करावे लागते. चुकीच्या मार्गावर आपले मन एकाग्र झाले तरीही तत्कालिक आनंद मिळतो. योग्य मार्गाने आपण सकारात्मकतेने मन एकाग्र केले तर चिरंतन आनंद मिळतो. आचार्य शांतीदेवांनी बुद्धाची साधना केली आणि ते बुद्ध झाले. जो आनंद तत्कालिक आहे तो खरा आनंद नाही. चुकीच्या परंपरेचे पालन केले तर तत्कालिक सुख मिळाले तरी अंतत: दु:खच मिळते, हा विचार आचार्यांनी समाजात रुजविला.
भगवान बुद्ध आणि आचार्य शांतीदेव यांच्या चरित्रात एक समानता आहे. दोघेही राजपुत्र होते पण त्यांचा जन्म वनात झाला. आचार्य सौराष्ट्रचे राजा राजा कल्याण वर्मा यांचे पुत्र होते. नांलदाच्या कुशल देव यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांनीच आचार्यांना शांतीदेव हे नाव दिले. साऱ्या भौतिक सुखावर लाथ मारूनही त्यांनी आपला आनंद शोधला. बाबासाहेब आंबेडकरांनीही गरीब घरातच जन्म घेतला आणि तमाम गरीब, शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले. त्यांचे हे महान कार्य जगात सर्वाधिक महत्त्वाचे आहे. जेथे त्यांनी दीक्षा घेतली त्याच भूमीवर हा बुद्ध महोत्सव होतो आहे, ही बाबही अतिशय महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.