शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

२०५० पर्यंत देशातील निम्म्या जिल्ह्यांमध्ये गंभीर जलसंकट; प्रतिव्यक्ती पाण्याची मागणीही वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 07:32 IST

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असलेल्या जलस्रोतांमुळे भारतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार नाही

नवी दिल्ली : हवामान बदलामुळे बदललेले ऋतुचक्र, भूगर्भातील पाण्याचा वारेमाप उपसा, जलपुनर्भरणाकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष यामुळे २०५० पर्यंत भारतातील निम्म्याहून अधिक देशांमध्ये गंभीर जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. कृषीक्षेत्रातील जलसंधारण क्षमता वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका अहवालात हा धक्कादायक इशारा देण्यात आला. त्यामुळे पुढील २५ वर्षांमध्ये भारतातील प्रतिव्यक्तीच्या पाण्याच्या मागणीत मोठी वाढ होणार आहे. 

तांदूळ, उसासाठी वारेमाप वापरदेशात शेतीसाठी सर्वाधिक प्रमाणात पाणी वापरले जाते. भारतात उपलब्ध पाण्याचा ८० ते ९० टक्के हिस्सा शेतीसाठी वापरण्यात येतो. त्यानंतर घरगुती तसेच औद्योगिक कारणांसाठी पाण्याचा उपयोग केला जातो. तांदूळ, गहू, ऊस या तीन पिकांसाठी सर्वाधिक पाणी वापरले जाते. शेतीसाठी पाणी नीट वापरले गेले तर २० टक्के पाण्याची बचत होऊ शकते असेही या अहवालात म्हटले आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रमाणात असलेल्या जलस्रोतांमुळे भारतात पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होणार नाही. ७६ टक्के लोकांकडे पुरेसे पाणी उपलब्ध नाही.  त्यामुळे देशापुढे पाणी टंचाईचे भीषण संकट निर्माण होण्याची भीती डीसीएम श्रीराम व सत्व नॉलेजच्या अहवालात म्हटले आहे.

१७% लोकसंख्या; ४% पाणीसाठाजगातील एकूण लोकसंख्येपैकी १७ टक्के लोक भारतात राहतात. जगातील एकूण पाणीसाठ्यापैकी केवळ ४ टक्केच पाणी भारतात उपलब्ध आहेत. प्रति व्यक्ती १,७०० क्युबिक मीटरपेक्षा कमी पाणी उपलब्ध असेल तर त्या भागात पाण्याचे गंभीर संकट उभे ठाकले आहे असे फ्लेंकेनमार्क इंडेक्समध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :water shortageपाणीकपात