शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

37वी भारतीय वैज्ञानिक अंटार्क्टिका मोहीम, 21 भारतीय संशोधकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:39 IST

अलिबाग- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या अंटार्क्टिका खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला

- जयंत धुळपअलिबाग- पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक आणि ९८ टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित असणा-या अंटार्क्टिका खंडावरील ३७व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेस नुकताच प्रारंभ झाला असून, २१ भारतीय संशोधकांचा समावेश असणा-या या मोहिमेचे उपनेते आणि अलिबाग येथील जागतिक कीर्तीच्या भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो हे या मोहिमेत यावेळी तिस-यांदा सहभागी झाले आहेत.भारती स्टेशन संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. शैलेश पेडणेकर या मोहिमेदरम्यान बर्फाच्छादित अंटार्क्टिका खंडावरील मैत्री स्टेशन या भारतीय संशोधन प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून भारतीय हवामान विभागाचे संशोधक सुन्नी चूग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याच खंडावरील भारत सरकारच्या भारती स्टेशन या संशोधन केंद्राचे प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च संस्थेचे संशोधक डॉ. शैलेश पेडणोकर यांची तर उप प्रमुख म्हणून अलिबाग भूचुंबकीय वेधशाळेचे प्रमुख व भूचुंबकीय शास्त्र संशोधक बागती सुदर्शन पात्रो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या सागरी जलप्रवासाचे (व्हॉयेज) प्रमुख म्हणून नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च संस्थेचे डॉ. योगेश राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अणू, वनस्पती, प्राणी आणि इलेक्टॉनिक्स संशोधकांचा समावेश३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेच्या उर्वरित १७ संशोधकांच्या चमू मध्ये डॉ.नरेंद्र सिंग रावत (भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर), डॉ.सुकूमार भक्ता (बॉटेनिकल सव्र्हे ऑफ इंडिया), अमित रावूतेला (डिफेन्स ईलेक्ट्रॉनिक्स अप्लिकेशन लॅबोरेटर), इलेक्टॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे एम.श्रीधर, अब्दूल हाय नोमान, इंश्वर राव, जी.नागाराजू, जी.लक्ष्मी नारायण रेड्डी, एस.राजू बाबू, राजेश कुमार तित्ला, सोमा राजू सोंगा, एस.सुधाकर, जिऑलॉजीकल सव्र्हे ऑफ इंडियाचे प्रदिप कुमार, मोहमद सादिक, दिपक युवराज गजभिये, झाहीद हाबीब आणि नॅशनल इंन्स्टीटय़ूट ऑफ हाय सिक्यूरीटी अनिमल डिसिजेसच्या संशोधक डॉ.अश्विन अशोक राउत यांचा समावेश आहे.अंटार्क्टिका खंडाचा शोधअंटार्क्टिका खंडाचा शोध जेम्स कुक यांनी सन १७७२ मध्ये लावला. त्यानंतर लगेचच म्हणजे ७ जानेवारी १८२० या दिवशी प्रथमच बेलिग्ज हाऊजेन या दर्यावद्र्याने सुमारे ५० किलोमीटर अंतरावरून बर्फाच्या डोंगरांची रांग पाहिली आणि त्याची विस्तृत माहिती जहाजाच्या रजिस्टरमध्ये नोंद करून ठेवली. आणि म्हणून या दिवशी या खंडाचा शोध लागला असे मानले जाते. दक्षिण ध्रुवाभोवतीचे खंड क्षेत्नफळ १,३३,७७,००० चौ. किमी. आहे. हा खंड दक्षिण अमेरिकेच्या भूप्रदेशापासून ९७० किमी. आणि दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड देशांपासून दूर व स्वतंत्र आहे. अंटार्कक्टिका सभोवतीच्या महासागराला अंटार्क्टिका  महासागर किंवा दक्षिण महासागर म्हटले जाते. बेटांवर बर्फाची जाडी ४२७० मी. आहे. खंडावरील बर्फाचा थर सरासरीने सुमारे १.६ किमी. जाडीचा आहे. जगातील शुद्ध पाण्याच्या एकूण साठय़ा पैकी फार मोठा भाग या खंडावर हिम व बर्फरूपाने साठलेला असल्याचे निष्कर्श या पूर्वी झालेल्या वैज्ञानिक संशोधन मोहिमांचे आहेत.अंटार्क्टिकावर पोहोचणार भारत १३ वा देश, १९८२ पासून भारतिय मोहिमांना प्रारंभ९ जानेवारी १९८२ रोजी भारताच्या पहिल्या वैज्ञानिक मोहिमेतील सदस्यांनी अंटार्क्टिकावर प्रथमच भारताचा तिरंगा फेंडा फडकवला. सन १९८३ मध्ये कर्नल सत्यस्वरूप शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण गंगोत्री हे कायमस्वरूपी स्थानक बांधले. तेव्हापासून या स्थानकावर वर्षभर राहण्यास सुरुवात करण्यात आली आहे. येथे केलेले संशोधन सायंटिफिक कमिटी फॉर अंटार्क्टिका रिसर्च (एस.सी.ए.आर.) या संस्थेला प्रथम पाठवले जाते आणि तेथून ते विश्वातील सर्व राष्ट्रांना जाते. भारत हा अंटार्क्टिका येथे पोहोचलेला जगातील १३ वा देश आहे. त्यामुळे भारताला अंटार्कक्टिका संबंधित सल्लामसलतीचा हक्क प्राप्त झाला आहे. दक्षिण गंगोत्री हे संशोधन केंद्र कालांतराने बंद करण्यात आलेले असून, सन १९८९ मध्ये मैत्री हे कायमस्वरुपी भारतीय संशोधन केंद्र येथे बांधण्यात आले. त्यानंतर भारती या दुस-या भारतीय संशोधन केंद्राची निर्मिती येथे करण्यात आली आहे.भारतीस प्रगत संशोधन प्राप्त होणारअंटार्क्टिका खंडावरील भारतीय वैज्ञानिक मोहिमांचे आयोजन गोवास्थित नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अ‍ँड ओशन रिसर्च या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येते. नुकत्याच सुरू झालेल्या ३७ व्या भारतीय वैज्ञानिक मोहिमेत भूचुंबकीयशास्त्र, अणू व अणुशक्ती, वनस्पतीशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, प्राणी व प्राणिजन्य व्याधी विषयक या खंडावर प्रगत संशोधन करण्यात येणार आहे.