शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

Sedition Law: राजद्रोह कायद्याला तूर्त स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 06:16 IST

फेरविचार पूर्ण होईपर्यंत नवे गुन्हे दाखल करण्यास मज्जाव; सर्व प्रकरणांच्या चौकशीस मनाई 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ब्रिटिश राजवटीत १८७०मध्ये तयार केलेल्या राजद्रोह कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली. १५२ वर्षांच्या या कायद्याचा फेरविचार करण्यासंदर्भात केंद्र सरकारने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राची दखल घेत न्यायालयाने हा आदेश दिला. 

फेरविचाराची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या कायद्यान्वये कोणताही नवा गुन्हा दाखल करण्यास तसेच राजद्रोहाच्या प्रकरणांमध्ये चौकशी करण्यास स्थगिती दिली आहे. राजद्रोहाच्या प्रकरणांतील आरोपींवरील कारवाईदेखील सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगित केल्याने त्यांना दिलासा मिळाला. पुढील आदेश मिळेपर्यंत ही स्थगिती कायम राहील असे न्यायालयाने सांगितले.

सादर केली गैरवापराची उदाहरणेराजद्रोह कायद्याचा काही प्रकरणांमध्ये गैरवापर करण्यात आल्याची उदाहरणे ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिली. हनुमान चालिसा म्हणण्याच्या एका प्रकरणात संबंधितांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याचाही उल्लेख ॲटर्नी जनरल यांनी केला होता.

आव्हान देणाऱ्या अनेक याचिकापुढील सुनावणी जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात आहे. राजद्रोही कृत्ये रोखण्यासाठी भारतीय दंड संहितेमध्ये १२४ अ कलमाचा अंतर्भाव ब्रिटिश राजवटीत करण्यात आला होता. कायद्याला आव्हान देणाऱ्या काही याचिका न्यायालयात दाखल आहेत. 

तरतुदी स्थितीशी सुसंगत नाहीतसरन्यायाधीश एन. व्ही. रामन यांच्या नेतृत्वाखालील व न्या. सूर्यकांत, न्या. हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले की, नागरी हक्क व देशहित यांचे संतुलन गरजेचे आहे. कायद्यातील तरतुदी सध्याच्या स्थितीशी सुसंगत नाहीत. 

का केला कायदा?स्वातंत्र्यपूर्व काळात वहाबी चळवळ वाढू लागली होती. त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली. त्याला प्रतिबंध करण्यासाठी राजद्रोहाचा कायदा ब्रिटिशांनी केला.

मेकॉलेने तयार केले कलम १२४ एराजद्रोहाचा कायदा असे म्हटले जात असले तरी तसा स्वतंत्र कायदा संसदेने संमत केलेला नाही. कलम १२४ मध्ये फौजदारी कायद्याच्या सर्व पैलूंचे वर्णन आहे. इंग्रजधार्जिणी शिक्षणपद्धती इथे रुजविणाऱ्या थॉमस मेकॉले यानेच १८७०मध्ये कलम १२४ए तयार केले.

इंग्लंडने १३ वर्षांपूर्वी हटविला कायदाब्रिटनमध्ये २००९ मध्ये राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यात आला. मात्र, भारतासह इराण, अमेरिका, सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, मलेशिया या देशांमध्ये अद्यापही हा कायदा लागू आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय