शहरं
Join us  
Trending Stories
1
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
2
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
3
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
4
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
5
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
6
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
7
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
8
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
10
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
11
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
12
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
13
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
14
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
15
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
16
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
17
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
18
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
19
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
20
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाक यांच्यात दुबईत गुप्त चर्चा; ‘राॅ’,‘आयएसआय’ अधिकाऱ्याचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 07:17 IST

India and Pakistan : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली.

नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तानच्या गुप्तचर विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यावर्षी जानेवारीत दुबईमध्ये ही बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताची गुप्तचर संस्था ‘राॅ’ आणि पाकिस्तानची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’च्या अधिकाऱ्यांनी दुबईमध्ये भेट घेतली. संयुक्त अरब अमिरातीने या भेटीसाठी पुढाकार घेतला हाेता. 
यासंबंधी दाेन्ही सस्थांनी अधिक माहिती दिली नाही. मात्र, पाकिस्तानातील सुरक्षाविषयक तज्ज्ञ आयेशा सिद्दीक यांच्यानुसार अशा प्रकारच्या बैठका यापूर्वीही गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या आहेत. या बैठका थायलंड, दुबई, तसेच लंडनमध्ये झाल्याची माहिती आयेशा यांनी दिली. 

वाढलेला तणाव
काश्मीरात २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने कठाेर भूमिका घेतली हाेती. भारताने त्यानंतर एअर स्ट्राइक करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे माेठे तळ उद्ध्वस्त केले हाेते. तेव्हापासून दाेन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे, तर यावर्षी काश्मीरमध्ये माेठ्या प्रमाणात घुसखाेरीही झाली असून, अनेक दहशतवाद्यांचा खात्माही करण्यात आला आहे.

संवाद महत्त्वाचा
-    चर्चा न करण्यापेक्षा दाेन्ही देशांमध्ये संवाद सुरू हाेणे जास्त चांगले आहे, असे संरक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र, या बैठकांबाबत जास्त वाच्यता न करता चर्चा सुरू ठेवणे अधिक याेग्य असल्याची भूमिका घेण्यात आली आहे. 
-    सध्या केवळ प्राथमिक स्वरूपाचीच चर्चा आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले. या चर्चेतून दाेन्ही देशांमध्ये सध्याची तणावाची परिस्थिती काही प्रमाणात कमी हाेईल. त्याशिवाय फार काही साध्य हाेणार नाही, असेही काही तज्ज्ञांचे मत आहे. 

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान