शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 14:02 IST

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली.

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली. न्यायाधीश एनव्ही रमन्ना म्हणाले की, काल रात्री १ वाजेपर्यंत आम्ही वाट पाहात होतो आणि प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट आम्हाला आत्ता मिळाला आहे. याआधीच्या सुनावणीवेळी आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं की पुढील सुनावणीच्या कमीत कमी एक दिवस आधीच स्टेटस रिपोर्ट सादर केला जावा. पण तसं झालेलं दिसत नाही. 

उत्तर प्रदेश सरकारकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी कोर्टासमोर संबंधित प्रकरणाचा प्रगती अहवाल सादर केला असून सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्याची मागणी केली. पण कोर्टानं सुनावणी टाळण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला. सुनावणी टाळणं योग्य ठरणार नाही, असं सांगत खंडपीठाकडून कोर्टातच सरकारनं सादर केलेल्या रिपोर्टचं वाचन केलं जात आहे. 

फक्त चार आरोपींना अटक का?लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणात उत्तर प्रदेश सरकार मागे हटत आहे, असं रोखठोक मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. या प्रकरणात तुम्ही फक्त ४ जणांची साक्ष का नोंदवली? इतर साक्षीदारांची साक्ष का नोंदवली नाही? फक्त ४ जणच पोलीस कोठडीत आणि इतर न्यायालयीन कोठडीत का? त्यांच्या चौकशीची गरज नाही का?, असे सवाल कोर्टानं उपस्थित केले. कोर्टानं प्रकरणाची सुनावणी २६ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. तसंच याप्रकरणाशी निगडीत साक्षीदार आणि पीडीतांचे जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय साक्षीदारांच्या सुरक्षेची काळजी घेण्याच्याही सूचना सरकारला केल्या आहेत. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारSupreme Courtसर्वोच्च न्यायालय