शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चिंता मिटली! सौदी अरेबिया भारताच्या मदतीला; अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 16:45 IST

अमेरिकेच्या इराणवरील निर्बंधांमुळे चिंतेत असलेल्या भारताला दिलासा

मुंबई: जगातील सर्वात मोठा खनिज तेल निर्यातदार असलेला सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये भारताला चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार आहे. इराणवर अमेरिकेनं निर्बंध जाहीर केले आहेत. यासोबतच इराणशी व्यापार करणाऱ्या सर्व देशांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा अमेरिकेनं दिला आहे. त्यामुळे इंधनाची मागणी पूर्ण कशी होणार हा प्रश्न भारतासमोर होता. मात्र सौदी अरेबिया अतिरिक्त खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्यानं भारताची चिंता मिटली आहे. पेट्रोलियम पुरवठादार देशांची संघटना असलेल्या ओपेकमध्ये इराणचा तिसरा क्रमांक लागतो. इराणकडून सर्वाधिक खनिज तेलाचा पुरवठा चीनला होतो. यानंतर भारताचा क्रमांक लागतो. मात्र अमेरिकेनं बहिष्काराची धमकी दिल्यानं खनिज तेलाची गरज कशी भागवायची, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र सौदी अरेबिया नोव्हेंबरमध्ये चार दशलक्ष बॅरल खनिज तेलाचा पुरवठा करणार असल्यानं भारताला दिलासा मिळाला आहे. 

सौदी अरेबियाची सर्वात मोठी तेल कंपनी असलेल्या अराम्कोनं प्रतिक्रिया दिलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्प, भारत पेट्रोलियन कॉर्प आणि मँगलोर रिफायनरी पेट्रोकेमिकल्स लिमिटेडनं नोव्हेंबरमध्ये 1 मिलियन बॅरल खनिज तेल मिळावं, अशी मागणी सौदी अरेबियाकडे केली होती. अमेरिका 4 नोव्हेंबरपासून इराणवर निर्बंध लादणार आहे. मात्र यानंतरही भारत इराणकडून खनिज तेलाची खरेदी सुरुच ठेवेल, अशी भूमिका पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी मांडली होती.  

टॅग्स :Crude Oilखनिज तेलIndiaभारतsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणPetrolपेट्रोलDieselडिझेल