शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

उपग्रहभेदी क्षेपणास्त्र काँग्रेसच्याच काळात झाले होते पूर्ण विकसित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 5:12 AM

उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र (अग्नी-५) विकसित केल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले होते.

नवी दिल्ली : उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र (अग्नी-५) विकसित केल्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी घेत असले तरी प्रत्यक्षात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातच हे तंत्रज्ञान पूर्ण विकसित झाले होते.उपग्रहाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र विकसित करण्याच्या संरक्षण संशोधन व विकास विभाग (डीआरडीओ) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) संयुक्त प्रस्तावास तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी २००८ सालीच परवानगी दिली होती. २००९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पुन्हा सत्तेत आल्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांनी क्षेपणास्त्र विकसित कार्यक्रमास प्रोत्साहन दिले. जानेवारी २००७ मध्ये चीनने क्षेपणास्त्राने एका उपग्रहाचा वेध घेतला होता. भारतासह सर्वच आशियाई देशांवर त्यामुळे दबाव वाढला. भारताने त्यास प्रत्युत्तराची तयारी २००८ पासूनच सुरू केली. मात्र, २०१० साली अमेरिकेने उपग्रह शस्त्रास्त्रांच्या वापरासंबंधी निर्बंध घालण्याचे संकेत दिले होते. भारताच्या उपग्रह भेदणाऱ्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर (ज्याची चाचणी बुधवारी झाली) आंतरराष्ट्रीय दबाव वाढला.आंतरराष्ट्रीय दबावावर ‘डिप्लोमसी’साठी डॉ. मनमोहनसिंग यांनी २०१० साली ‘अवकाश सुरक्षा समन्वय समूह’ (एसएससीजी) स्थापन केला होता. आंतरराष्ट्रीय समूहाकडून येणाऱ्या प्रश्नांना उत्तरे देण्याची या गटाची जबाबदारी होती. आंतरराष्ट्रीय दबाव कमी करण्यात यश आल्याने २६ एप्र्रिल २०१२ रोजी उपग्रह भेदणारे क्षेपणास्त्र भारताने स्वबळावर विकसित केले होते.तेव्हा सरकारने परवानगी दिली नव्हती; जेटलींचा आरोपअरूण जेटली यांनीदेखील यूपीए सरकारला उपग्रह भेदणाºया अग्नी-५ क्षेपणास्त्राची चाचणी न करण्यासाठी दोष दिला. तत्कालीन सरकारमध्ये क्षमता व स्पष्टता नव्हती. भारत उपग्रहभेदी क्षेपणास्त्र विकसित करू शकत होता. मात्र, सरकारने त्यास परवानगी दिली नव्हती, असा आरोप जेटलींना केला.

टॅग्स :Mission Shaktiमिशन शक्ती