शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 21:20 IST

लोकभारतीच्या माध्यमातून कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते

नवी दिल्ली - आठ महिन्यांपूर्वी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना करणारे माजी आमदार कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत कपिल पाटील यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दिल्ली येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाला पाठिंबा देत पुन्हा एनडीएसोबत गेले. मात्र त्यांच्या या निर्णयाला विरोध करत जेडीयू पक्षाचे महाराष्ट्रातील नेते कपिल पाटील यांनी समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापना केली. कपिल पाटील हे शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते. त्याशिवाय ते जनता दल यूनायटेडचे राष्ट्रीय महासचिव होते. नितीश कुमारांच्या निर्णयामुळे ते नाराज झाले होते. 

काँग्रेस पक्षप्रवेशानंतर कपिल पाटील यांनी लोकमत ऑनलाईनशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, मी समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. देशात फॅसिझमविरोधात आमची लढाई आहे. या लढाईत राहुल गांधी भारत जोडो माध्यमातून लढत आहेत. त्यामुळे त्यांचे हात बळकट करण्यासाठी आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. हा प्रवेश कुठल्याही हेतूने अथवा विधानसभा मतदारसंघातील तिकीटासाठी झालेला नाही असं त्यांनी स्पष्ट केले. मात्र ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कपिल पाटील यांचा काँग्रेसमधील पक्षप्रवेश महत्त्वाचा वाटतो. गोरेगाव किंवा वर्सोवा मतदारसंघातून कपिल पाटील यांना महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकते अशी चर्चा आहे. 

कोण आहेत कपिल पाटील?

लोकभारतीच्या माध्यमातून कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघातून ३ टर्म निवडून आले होते. समाजवादी विचारसरणी, शिक्षकांसाठी भांडणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. २००६ साली पहिल्यांदा त्यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघात विजय मिळवला होता. नुकत्याच झालेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत कपिल पाटील यांनी माघार घेतली होती. कपिल पाटील हे नेहमी पुरोगामी चळवळीशी जोडलेले नेते आहेत. लोकभारती या संघटनेतून त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवले आहेत.  

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलRahul Gandhiराहुल गांधीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४