शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

पगारातील वाढती दरी...

By admin | Updated: March 8, 2015 00:31 IST

पगारातील वाढती दरी...

पगारातील वाढती दरी...
मुंबई : गेल्या सात वर्षांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पगारामधील दरी वाढत चालली आहे. भारतात २००८ पासून २०१४ पर्यंतच्या म्हणजेच सात वर्षांच्या कालावधीत पगाराची दरी ५२.१४ टक्के इतकी वाढली आहे. जागतिक मंदीमुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात ही दरी वाढत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.
पगारातील ही दरी भारताच्या बरोबरीनेच चीनमध्ये देखील वाढते आहे. ब्राझीलमध्ये पगाराची दरी थोड्या प्रमाणात वाढलेली आहे. तर, उलटपक्षी रशियामध्ये उच्चपदस्थ आणि कर्मचार्‍यांच्या पगारातील दरी कमी झाली आहे. जगभरातील देशांत पगाराच्या पद्धतीचा सर्वेक्षणात अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, २००८ साली सर्वसाधारण कर्मचारी म्हणून काम करणार्‍या व्यक्तीला मिळणार्‍या पगारापेक्षा ७.७ पट जास्त पगार हा उच्चपदस्थ अधिकार्‍याला मिळत होता. सात वर्षांनी म्हणजे २०१४ मध्ये उच्चपदस्थ अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या पगारातील चार पटीने वाढलेली आहे. २०१४ मध्ये सर्वसामान्य कर्मचार्‍यांना मिळणार्‍या पगारापेक्षा ११.७ पट जास्त पगार उच्चपदस्थ अधिकार्‍यांना मिळतो आहे.
लिपीक, सुपरवाइझर, फक्त पदवीधर व्यक्ती आणि विभाग प्रमुख यांच्या पगारातील तफावत जास्त प्रमाणात वाढत गेली आहे. जागतिक आर्थिक मंदी हे पगारातील तफावत वाढत जाण्याचे प्रमुख एक कारण आहे, असे म्हटले जाते. पण, प्रत्यक्षात गेल्या ३० वर्षांतल्या आर्थिक मंदीमुळे ही तफावत वाढत गेली आहे. भारतात पगारात वाढत जाणारी तफावत ही सातत्याने वाढत जाणारी आहे. २००८ मध्ये ही तफावत ७.७ पट होती. २०११ मध्ये ९.२ पट इतकी होती आणि २०१४ मध्ये ही तफावत ११.७ पटीने वाढली आहे. वाढणारी स्पर्धा आणि नोकरीच्या मर्यादित संधी यामुळे ही तफावत वाढत चालली आहे.
उच्चपदस्थ अधिकार्‍यांचे काम करताना कल्पकता, कौशल्य लागते. याचबरोबरीने ते काम जोखमीचे, जबाबदारीचे असते. यामुळेच त्यांना जास्त पगार दिला जात असल्याचे दिसून आले.
................................
(चौकट)
कसे केले सर्वेक्षण?
जगातील ११० देशातील २४ हजार कार्यालयात/संस्थांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १६ दशलक्ष कर्मचार्‍यांचा समावेश होता. त्या कार्यालयातील / संस्थांतील उच्चपदस्थ अधिकारी आणि सर्वसामान्य कर्मचारी या दोघांच्या पगारातील फरक आर्थिक मंदीपासून म्हणजे २००८ पासून तपासण्यात आला.