शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 19:26 IST

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे.

ठळक मुद्देदेशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका, दिग्विजय सिंहांचा पायलटांना सल्लादिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.दिग्विजय सिंह म्हणाले, महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण...

भोपाळ - राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटासाठी भाजपाला जबाबदार धरत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सचिन पायलटांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका. आपल्यासाठी काँग्रेसमध्ये उज्जवल भविष्य आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपात गेलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसारखं अनुकरण करू नये.

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या खुर्चीवर तलवार लटली आहे. भाजपा राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. असे असतानाच दिग्विजय सिंहानी पायलटांना सल्ला दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनीही. राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मी केलेल्या कॉलला आणि पाठवलेल्या मेसेजसला ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.' तसेच, "अशोक गेहलोत यांच्याकडून आपण दुखावले गेले असलात तरीही, असे सर्व मुद्दे शांततेने सोडविले जातात. शिंदेंनी जी चूक केली, ती आपण करू नये. भाजपा अविश्वसनीय आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षातून भाजपात गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला तेथे यशस्वी होता आलेले नाही,' असे दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण... -"ही पहिलीच वेळ आहे, की पायलटांनी मला उत्तर दिले नाही. सचिन माझ्या मुलासारखा आहे. ते माझा सन्मान करतात आणि मलाही ते आवडतात. मी त्यांना तीन-चार वेळा फोन केला आणि मेसेजही केले. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. ते आधी तत्काळ उत्तर देत होते. महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट आहे. महत्वाकांक्षेशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. मात्र, महत्वकांक्षेबरोबरच प्रत्येकानेच आपली संघटना, विचारधारा आणि राष्ट्राप्रती एकनिष्ठ असायला हवे,' असेही दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस