शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

राजस्थान संकट : दिग्विजय सिंहांचा सचिन पायलटांना सल्ला, म्हणाले - 'जोतिरादित्य शिंदेंसारखं...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2020 19:26 IST

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे.

ठळक मुद्देदेशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका, दिग्विजय सिंहांचा पायलटांना सल्लादिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.दिग्विजय सिंह म्हणाले, महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण...

भोपाळ - राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटासाठी भाजपाला जबाबदार धरत काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सचिन पायलटांना सल्ला दिला आहे. ते म्हणाले, देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाला सोडू नका. आपल्यासाठी काँग्रेसमध्ये उज्जवल भविष्य आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडून भाजपात गेलेले माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंसारखं अनुकरण करू नये.

काँग्रेसने पायलटांना उपमुख्यमंत्री पदाबरोबरच राजस्थानच्या प्रदेशाध्यक्ष पदावरूनही काढले आहे. पायलटांसोबत आणखी 18 आमदारांनी बंडखोरी केली आहे. यामुळे राजस्थानातील अशोक गेहलोत यांच्या खुर्चीवर तलवार लटली आहे. भाजपा राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. असे असतानाच दिग्विजय सिंहानी पायलटांना सल्ला दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनीही. राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय संकटामागे भाजपाचा हात असल्याचे म्हटले आहे. ते पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

दिग्विजय सिंह म्हणाले, 'मी पायलटांना फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र, मी केलेल्या कॉलला आणि पाठवलेल्या मेसेजसला ते कसल्याही प्रकारचे उत्तर देत नाहीत.' तसेच, "अशोक गेहलोत यांच्याकडून आपण दुखावले गेले असलात तरीही, असे सर्व मुद्दे शांततेने सोडविले जातात. शिंदेंनी जी चूक केली, ती आपण करू नये. भाजपा अविश्वसनीय आहे. एखाद्या दुसऱ्या पक्षातून भाजपात गेलेल्या कुठल्याही व्यक्तीला तेथे यशस्वी होता आलेले नाही,' असे दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट, पण... -"ही पहिलीच वेळ आहे, की पायलटांनी मला उत्तर दिले नाही. सचिन माझ्या मुलासारखा आहे. ते माझा सन्मान करतात आणि मलाही ते आवडतात. मी त्यांना तीन-चार वेळा फोन केला आणि मेसेजही केले. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. ते आधी तत्काळ उत्तर देत होते. महत्वाकांक्षा असणे चांगली गोष्ट आहे. महत्वाकांक्षेशिवाय कुणीही पुढे जाऊ शकत नाही. मात्र, महत्वकांक्षेबरोबरच प्रत्येकानेच आपली संघटना, विचारधारा आणि राष्ट्राप्रती एकनिष्ठ असायला हवे,' असेही दिग्विजय सिंह म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या -

15 जूनची रात्र : गलवानमध्ये भारतीय जवानांची 'बायोनेट' फाइटिंग, 'तो' बंधारा फुटल्यानंही मारले गेले चिनी सैनिक

पंतप्रधान मोदींची लोकप्रियता वाढली, Twitterवरील फॉलोअर्सची संख्या 6 कोटींच्या पुढे!

बुरखा फाटला!, सरकार PLA सोबत संबंध असणाऱ्या कंपन्यांविरोधात अॅक्शन घेण्याच्या तयारीत

Amazonवर पुन्हा 'Apple'चा सेल, iPhone 11 सह 'या' प्रोडक्ट्सवर मिळणार मोठा डिस्काउंट

चार तरुणांनी 'असे' हॅक केले होते, ओबामा अन् बिल गेट्ससह तब्बल 130 दिग्गजांचे ट्विटर अकाउंट 

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहRajasthanराजस्थानSachin Pilotसचिन पायलटAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेस