शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

उपद्रवींच्या मुसक्या आवळणार

By admin | Updated: August 28, 2016 00:40 IST

केंद्रीय संस्थांनी जम्मू आणि काश्मीरात निदर्शनांसाठी लोकांना भडकावणाऱ्या ४०० स्थानिक नेत्यांची ओळख पटविली असून खोऱ्यातील हिंसाचार सत्र थांबविण्यासाठी पोलिस

नवी दिल्ली : केंद्रीय संस्थांनी जम्मू आणि काश्मीरात निदर्शनांसाठी लोकांना भडकावणाऱ्या ४०० स्थानिक नेत्यांची ओळख पटविली असून खोऱ्यातील हिंसाचार सत्र थांबविण्यासाठी पोलिस लवकरच त्यांची धरपकड करणार आहेत. या यादीत हिजबुल मुजाहिद्दीन आणि इतर दहशतवादी संघटनेचे कार्यकर्ते तसेच तेहरीक ए हुरियत, जमात ए इस्लामीच्या स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे, असे गुप्तचर अधिकाऱ्यांनी सांगितले. हे स्थानिक नेतेच किशोरवयीन मुलांसह १० ते १२ वर्षांच्या मुलांना दगडफेक करण्यास चिथावतात. यातील काही जण दक्षिण काश्मिरात हिजबुलचे उघडणपणे काम करणारे कार्यकर्ते असून ते दहशतवाद्यांना आश्रय देण्यासह इतर सुविधा पुरविण्याचे काम करतात, असेही सूत्रांनी सांगितले. केंद्रीय संस्थांनी त्यांची नावे राज्य पोलिस दलाला दिली आहेत. श्रीनगर : ४९ दिवसानंतर दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग शहरातील संचारबंदी उठविताच, तिथे हिंसाचार झाला आणि त्यात २५ जण जखमी झाले. त्यामुळे पुन्हा तिथे संचारबंदी लागू करावी लागली. श्रीनगरसह इतर काही भागात संचारबंदी कायम ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. फुटीरवाद्यांचा बदामीबाग येथील लष्करी मुख्यालयावर मार्च काढण्याचा मनसुबा होता. मात्र, हुरियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांना अटक करून पोलिसांनी हे प्रयत्न उधळून लावले. गिलानी नजरकैदेत आहेत. त्यांनी त्याचे उल्लंघन करताच हैदरपुरा येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ त्यांना अटक करण्यात आली. श्रीनगर आणि दक्षिण काश्मीरातील पुलवामा आणि पम्पोर येथील संचारबंदी मात्र कायम ठेवण्यात आली आहे.दरम्यान, संचारबंदी, जमावबंदी आणि फुटीरवाद्यांच्या बंदमुळे ५० व्या दिवशीही खोऱ्यातील जनजीवन सुरळित होऊ शकले नाही. दुकाने, खासगी कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि पेट्रोलपंप बंद होते. याशिवाय संपूर्ण खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर बुऱ्हाण वनी चकमकीत ठार झाल्यापासून सुरू असलेल्या हिंसाचारात आतापर्यंत ६८ लोकांचा बळी गेला असून त्यात दोन पोलिसांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात पोलिस कर्मचाऱ्याची संशयित अतिरेक्यांनी शनिवारी गोळ््या घालून हत्या केली. कॉन्स्टेबल अहमद गनाई यांच्यावर कोईल येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ अज्ञात बंदुकधाऱ्याने गोळीबार केला. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. (वृत्तसंस्था)जगात पाकचा कांगावा- काश्मीरमधील जनतेवर भारत सरकार कसे अत्याचार आणि अन्याय करीत असल्याचा जगभरातील देशांमध्ये प्रचार करण्यासाठी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी २२ संसद सदस्यांची नियुक्ती केली आहे. हे खासदार संयीक्त राष्ट्रांमध्ये तसेच सर्व देशांमध्ये जातील आणि भारतातर्फे काश्मीरमधील जनतेवर अत्याचार असल्याचा प्रचार करतील. - काश्मिरी जनतेला आपण कुठे राहायचे, याबाबतचा स्वयंअधिकार मिळावा, ही मागणी संयुक्त राष्ट्रांमध्ये कणखरपणे मांडण्यात येईल, असे नवाज शरीफ यांनी म्हटले आहे. पूर्वी भारतानेच काश्मीर वादाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित केला होता. पण आता त्याविषयी काहीच बोलायला भारत तयार नाही, असे पाकिस्तानी पंतप्रधानांनी म्हटल्याचे वृत्त रेडिओ पाकिस्तानने दिले आहे.