शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून तरुण फिरवतात शेतीकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 14:47 IST

शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे

‘आपला देश शेतीप्रधान आहे. देशातील ७० टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत’, हे वर्षानुवर्षे आपण ऐकत आलोत, पण खरंच शेती किती जण करतात, शेती करणाऱ्यांची संख्या किती आहे, हे आपल्याला माहीत आहे का?

यासंदर्भातली वस्तुस्थिती समजून घेतली तर आपल्याला धक्का बसेल. बेभरोशी शेती आणि जगण्याची ऐशीतैशी, हे वास्तव कायमच डोळ्यांसमोर असल्यानं ग्रामीण भागातही शेती करण्यास आता कोणी तयार नाही. शेतीतील तरुण मुलांची संख्या तर झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं वयही वाढत चाललंय.

‘डाऊन टू अर्थ’ या संस्थेचे अभ्यासक रिचर्ड महापात्रा यांच्या अभ्यासानुसार काळ्या मातीत धान्य पिकवणाऱ्या आणि देशाला ‘जगवणाऱ्या’ शेतकऱ्यांचं भारतातलं सरासरी वय पन्नाशीच्या पार गेलं आहे. २०१६ मध्ये केलेल्या एका पाहणीत भारतीय शेतकऱ्यांचं सरासरी वय होतं ५० वर्षे. २०११ साली झालेल्या जनगणनेनुसार भारतात दररोज सरासरी दोन हजार शेतकरी शेतीला रामराम ठोकताहेत.

यासंदर्भातलं वास्तव इतकं धक्कादायक आहे, की शेतकी विद्यापीठातून शेतीशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या आणि घेत असलेल्या तरुण विद्यार्थ्यांनीही शेतीकडे पाठच फिरवली आहे आणि शेती सोडून दुसऱ्या क्षेत्राकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे. अर्थातच याचं कारणही स्पष्ट आहे. लहरी हवामान आणि बेभरोशी शेती. इतर क्षेत्रातून मिळणाऱ्या उत्पन्नाचं प्रमाण शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा किमान पाच पटीनं अधिक आहे.

यासंदर्भात ‘प्रथम’ या संस्थेनं २०१७ साली तीस हजार तरुणांचा एक अभ्यास केला. या अभ्यासानुसार यातील केवळ १.२ टक्के तरुणांना शेती हा व्यवसाय म्हणून स्वीकारायचा होता, १८ टक्के तरुणांनी आर्मीला तर १२ टक्के तरुणांनी इंजिनिअरिंगला पसंती दिली होती. शेतीत महिलांचा वाटाही प्रचंड मोठा आहे, पण २५ टक्के महिलांनी शिक्षकी पेशाला पसंती दिली होती.

‘प्रथम’ या संस्थेचे संस्थापक माधव चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार शेतीतील तरुणांची संख्या कमी होते आहे, हे तर खरेच, पण शेतीच शेतकऱ्यांना बाहेर काढतेय, हेही यासंदर्भातलं एक मोठं वास्तव आहे. भारताची लोकसंख्या जशी वाढतेय, तशीच घरकुलांची संख्याही. गेल्या दहा वर्षांत घरकुलांची संख्या तब्बल ३३ टक्क्यांनी वाढलीय. त्यामुळेही शेती परवडेनाशी झालीय.

अर्थातच ही स्थिती फक्त भारतातच आहे असं नाही, अख्ख्या जगभरातल्या तरुणांना शेती नकोशी आहे. अमेरिकेत आज शेतकऱ्यांचं सरासरी वय आहे ५८ वर्षे, तर जपानमध्ये ६७ वर्षे. युरोपमधला प्रत्येक तिघांतला एक शेतकरी पासष्टीच्या पुढचा आहे. पुढच्या सहा वर्षांत जपानमधल्या ४० टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडलेली असेल, अशी स्थिती आहे.

२०५० पर्यंत भारताची लोकसंख्या १९० कोटीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. अशावेळी अन्नधान्याचं उत्पादन हे भारतापुढचं सर्वोच्च असणार आहे. मात्र याच विपरित स्थितीत आशेचा एक किरणही डोकावतो आहे. जगभरात शेतकऱ्यांची ‘डिमांड’ मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या क्षेत्रात खूप मोठी पोकळी निर्माण झाल्यानं खोऱ्यानं पैसे मिळवण्याची अनोखी संधीही त्यांच्यापुढे चालून येणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीIndiaभारतResearchसंशोधन