शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
3
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
4
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
5
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
6
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
7
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
8
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
9
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
10
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
11
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
12
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
13
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
14
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
15
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
16
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
17
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
18
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
19
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
20
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट

समुद्रातील प्लास्टिक कचरा संपविण्यासाठी केरळने वापरला 'रस्ते' मार्ग 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 12:42 PM

केरळ सरकारने समुद्रातून वाहून येणाऱ्या प्लास्टिकसाठी विशेष मोहीम राबवली आहे.

थिरुवनंतपूरम- समुद्रातून प्लास्टिक वाहून येणं ही सर्वच मोठ्या शहरांची समस्या झाली आहे. मुंबईसह किनारी प्रदेशातील शहरांच्या किनार्यांवर हे प्लास्टिक वाहून आलेले दिसते. महाराष्ट्र सरकारने नुकतीच प्लास्टिकच्या काही वस्तूंवर बंदी लादली आहे. त्याचा प्लास्टिक कचऱ्यावर नक्की काय परिणाम होणार हे आताच सांगता येणार नाही. पण केरळ सररारने मात्र समुद्रातून परत येणार्या प्लास्टिक कचर्यावर अभिनव योजना सुरु केली आहे. सागरकिनारा लाभलेल्या इतर राज्यांनी त्याचा अवलंब करायला हरकत नाही. 

केरळमध्ये गेली काही वर्षे मासेमारी करताना जाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक सापडत आहे. यामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसानही होत आहे. त्यामुळे राज्याच्या मत्स्यसंवर्धन खात्याच्या मंत्री जे. मर्सिकुट्टी अम्मा यांनी 'शुचित्व सागरम' नावाची योजना सुरु केली. या योजनेमुळे कोळ्यांच्या जाळ्यात सापडलेले प्लास्टिकचे वर्गिकरण करुन त्याचे बारिक तुकडे केले जातील. या प्लास्टिकचा वापर रस्ते तयार करण्यासाठी अस्फाल्टला पर्याय म्हणून केला जात आहे. 

या योजनेमुळे कचरा वर्गिकरण करणे, त्याचे रस्त्यासाठी योग्य पदार्थाच रुपांतर करणे या कामांना गती मिळाली व नवे रोजगार निर्माण झाले. डांबर ५० अंश सेल्सियस तापामानास वितळू लागते तर प्लास्टिकचे रस्ते वितळण्यास ६६ अंश तापमानाची गरज असते. त्यामुळे हे रस्ते जास्त टिकतात.१ किमी रस्ता तयार करण्यासाठी १० लाख प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जातो. आपल्या नेहमीच्या रस्त्यांच्या निर्मितीशुल्कापेक्षा ८% कमी खर्चात हे रस्ते तयार होतात. प्रत्येक भारतीय व्यक्ती दरवर्षी ११ किलो प्लास्टिक कचरा तयार करतो. भारताची लोकसंख्या लक्षात घेता हे प्रमाण काळजी करायला लावणारे आहे. त्यामुळे केरळ सरकारप्रमाज्ञे प्लास्टिक कचरा संपविण्यास रस्त्यांचा 'मार्ग' इतर राज्यांनी वापरायला हरकत नाही.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpollutionप्रदूषणKeralaकेरळkeralकेरळroad transportरस्ते वाहतूक