शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 12:05 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत एनडीएला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. जनतेने मतपेटीतून स्पष्ट केले की, मोदींना हटविणे सोपं नाहीच. परंतु, त्याचवेळी भाजपशी बंडोखोरी करून विरोधकांना सामील झालेल्या सात खासदारांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.

या खासदारांना २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत जबरदस्त विजय मिळवला होता. मात्र २०१९ येईपर्यंत या खासदारांना भाजपमधील वातावरण भावले नाही. त्यानंतर या नेत्यांनी पक्षांतर करून २०१९ लोकसभा निवडणूक दुसऱ्या पक्षांकडून लढवली. परंतु, यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

शत्रुघ्न सिन्हा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सिन्हा यांचा पराभव केला.

किर्ती आजाद

काँग्रेस उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आजाद धनबाद मतदार संघातून पराभूत झाले. या मतदार संघातून पीएन सिंह यांनी बाजी मारली. २०१४ मध्ये दरभंगा मतदार संघातून किर्ती आजाग भाजपकडून निवडून आले होते. याचवर्षी किर्ती आजाद यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अशोक कुमार दोहरे

२०१४ मध्ये इटावा मतदार संघातून अशोक कुमार दोहरे यांनी विजय मिळवला होता. मात्र काही दिवसानंतर त्यांनी भाजपविरुद्धच शड्डू ठोकला होता. अखेरीस त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळी इटावा मतदार संघातून दोहरे यांचा पराभव झाला.

नाना पटोले

२०१४ लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात भाजपला विजय मिळवून देणारे नाना पटोले यांनी भाजपसोबत बंडखोरी केली. मात्र यावेळी नागपूर मतदार संघातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सावित्री बाई फुले

भाजपसोबत बंडखोरी करून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्री बाई फुले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांनी काँग्रेसकडून बहराइच मतदार संघातून निवडणूक लढवली होती. भाजपकडून या मतदार संघातून अक्षयबर लाल यांना तिकीट देण्यात आले होते. त्यांचा विजय झाला.

शाम चरण गुप्ता

उत्तर प्रदेशातील बांदा लोकसभा मतदार संघातून सपा-बसपा-आरएलडी युतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शाम चरण गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शाम चरण गुप्ता यांनी भाजपला अलविदा केला होता. २०१४ मध्ये ते इलाहाबादमधून खासदार होते.

मानवेंद्र सिंह

मानवेंद्र सिंह काही दिवसांपूर्वीच भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेने मानवेंद्र सिंह यांना बाडमेर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्या कैलाश चौधरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी