शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
4
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
5
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
6
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
7
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
8
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
9
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
10
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
11
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
12
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
13
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
14
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
15
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
16
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
17
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
18
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
19
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
20
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय

भाजपमधील 'त्या' सात बंडखोर खासदारांना जनतेने दाखवला घरचा रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 12:05 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपप्रणीत एनडीएला लोकसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळाले. जनतेने मतपेटीतून स्पष्ट केले की, मोदींना हटविणे सोपं नाहीच. परंतु, त्याचवेळी भाजपशी बंडोखोरी करून विरोधकांना सामील झालेल्या सात खासदारांना जनतेने घरचा रस्ता दाखवला आहे.

या खासदारांना २०१४ मध्ये आलेल्या मोदी लाटेत जबरदस्त विजय मिळवला होता. मात्र २०१९ येईपर्यंत या खासदारांना भाजपमधील वातावरण भावले नाही. त्यानंतर या नेत्यांनी पक्षांतर करून २०१९ लोकसभा निवडणूक दुसऱ्या पक्षांकडून लढवली. परंतु, यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

शत्रुघ्न सिन्हा

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी सिन्हा यांचा पराभव केला.

किर्ती आजाद

काँग्रेस उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू किर्ती आजाद धनबाद मतदार संघातून पराभूत झाले. या मतदार संघातून पीएन सिंह यांनी बाजी मारली. २०१४ मध्ये दरभंगा मतदार संघातून किर्ती आजाग भाजपकडून निवडून आले होते. याचवर्षी किर्ती आजाद यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

अशोक कुमार दोहरे

२०१४ मध्ये इटावा मतदार संघातून अशोक कुमार दोहरे यांनी विजय मिळवला होता. मात्र काही दिवसानंतर त्यांनी भाजपविरुद्धच शड्डू ठोकला होता. अखेरीस त्यांनी निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळी इटावा मतदार संघातून दोहरे यांचा पराभव झाला.

नाना पटोले

२०१४ लोकसभा निवडणुकीत भंडारा-गोंदिया मतदार संघात भाजपला विजय मिळवून देणारे नाना पटोले यांनी भाजपसोबत बंडखोरी केली. मात्र यावेळी नागपूर मतदार संघातून नितीन गडकरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

सावित्री बाई फुले

भाजपसोबत बंडखोरी करून काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्री बाई फुले यांना लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांनी काँग्रेसकडून बहराइच मतदार संघातून निवडणूक लढवली होती. भाजपकडून या मतदार संघातून अक्षयबर लाल यांना तिकीट देण्यात आले होते. त्यांचा विजय झाला.

शाम चरण गुप्ता

उत्तर प्रदेशातील बांदा लोकसभा मतदार संघातून सपा-बसपा-आरएलडी युतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शाम चरण गुप्ता यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच शाम चरण गुप्ता यांनी भाजपला अलविदा केला होता. २०१४ मध्ये ते इलाहाबादमधून खासदार होते.

मानवेंद्र सिंह

मानवेंद्र सिंह काही दिवसांपूर्वीच भाजपसोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. काँग्रेने मानवेंद्र सिंह यांना बाडमेर मतदार संघातून उमेदवारी दिली होती. मात्र भाजपच्या कैलाश चौधरी यांच्याविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी