शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

कमाई, पढाई, दवाईवर राजदचा भर; बिहारमध्ये तेजस्वी- नितीशकुमारांमध्ये काट्याची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2020 1:34 AM

Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. 

पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजदच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि नितीशकुमारांच्या नेतृत्वातील आघाडी यांच्यातील लढत अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. भाजप आणि जदयूच्या खेळीपासून तेजस्वी हे अतिशय सावध आहेत. जंगल राज का युवराज ही मोदींची टीका असो की, लालूप्रसादांच्या कुटुंबीयांवर नितीशकुमार करत असलेली टीका असो तेजस्वी यादव हे त्याला उत्तर न देता वास्तविक प्रश्नांवर बोला असे थेट आव्हान देत आहेत. रोजगार, गरिबांमधील शिक्षणाची परिस्थिती आणि आरोग्य यासारख्या विषयांवर तेजस्वी हे लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत. तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले असून, जदयू त्यावर टीका करत आहे. तेजस्वी हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जदयूचे नेते करतआहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजदचे सरकार नोकऱ्या देण्याचे आश्वासन का पूर्ण करू शकले नाही, असा सवाल जदयूचे नेते विचारत आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार