शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

व्हॉट्सअॅपवरून दिला निकाल; न्यायाधीशावर कोर्ट संतापले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 04:35 IST

एका फौजदारी खटल्यात आरोपनिश्चितीचा निकाल व्हॉट्सअॅप कॉलवरून दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.

नवी दिल्ली : हजारीबाग येथील सत्र न्यायालयाने झारखंडचे एक माजी मंत्री व आमदार असलेली त्यांची पत्नी यांच्याविरुद्ध एका फौजदारी खटल्यात आरोपनिश्चितीचा निकाल व्हॉट्सअॅप कॉलवरून दिल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला.सत्र न्यायालयाने अवलंबिलेल्या या पद्धतीवर ताशेरे ओढत न्या. शरद बोबडे व न्या. एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने म्हटले की, अशा प्रकारे खटल्याचे कामकाज चालविणे ही फौजदारी न्यायदानाची घोर थट्टा आहे. असे व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून खटले चालविले जाऊ शकत नाहीत. याने न्यायप्रक्रियेची अप्रतिष्ठा होते. ते चालू देणार नाही.झारखंडचे माजी मंत्री योगेंद्र साओ आणि त्यांची आमदार पत्नी निर्मला देवी यांच्याविरुद्ध हजारीबाग न्यायालयात सन २०१६ मधील एक दंगलीचा खटला प्रलंबित आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी या खटल्यात दोघांना जामीन मंजूर करताना त्यांनी भोपाळमध्ये राहावे, अशी अट घातली होती, तसेच भोपाळ जिल्हा न्यायालय व हजारीबाग जिल्हा न्यायालय यांच्या दरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवा उपलब्ध करून त्याद्वारे हा खटला चालवावा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.या आरोपी दाम्पत्याचे ज्येष्ठ वकील विवेक तनखा यांनी वरील खंडपीठास सांगितले की, ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा बऱ्याच वेळा नीट चालत नाही. त्यामुळे हजारीबाग न्यायालयाने १९ एप्रिल रोजी आरोप निश्चित करण्याचे कामकाज व्हॉट््सअ‍ॅप कॉलवरून केले. आरोपींनी या पद्धतीस आक्षेप घेऊनही न्यायालयाने ऐकले नाही व व्हॉट््सअ‍ॅपवरूनच आरोपनिश्चितीचा आदेश दिला.झारखंड सरकारच्या वकिलाने सबब सांगितली की, आरोपींनी भोपाळमध्ये राहावे, असे सांगूनही अनेकदा ते तेथे नसतात. त्यामुळे खटल्याचे काम रखडू लागले. म्हणून हा व्हॉट््सअ‍ॅपचा मार्ग निवडला. यावर खंडपीठाने म्हटले की, आरोपींनी जामिनाच्या अटी पाळल्या नसतील, तर आम्ही त्यांची मुळीच गय करणार नाही, पण यासाठी जामीन रद्द करण्यासाठी रीतसर अर्ज करणे हा न्यायसंगत मार्ग आहे. अ‍ॅड. तनखा यांनी सांगितले की, हे दोन्ही आरोपी राजकारणी आहेत व त्यांनी राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळाच्या (एनटीपीसी) भूसंपादनाविरुद्ध आंदोलनाचे नेतृत्व केले म्हणून त्यांच्यावर हे विविध खटले दाखल केले गेले आहेत. योगेंद्र साओ यांच्यावर २१ तर त्यांच्या पत्नीवर पाच खटले प्रलंबित आहेत. व्हॉट््सअ‍ॅपच्या माध्यमातून चालविलेला खटला हा त्यापैकीच एक आहे. व्हॉट््सअ‍ॅपवर खटला चालविणे कसे वैध आहे याखेरीज खटले वर्ग करण्याच्या विनंतीवर झारखंड सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले.>खटले हजारीबागहून दिल्लीत वर्ग कराराजकारणी नेत्यांविरुद्धचे खटले विशेष न्यायालयात चालवून ते लवकर निकाली काढण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्लीत यासाठी विशेष न्यायालय आहे. साओ पती-पत्नीवरील खटले हजारीबागहून दिल्लीत वर्ग करून ते येथील विशेष न्यायालयात चालवावे, अशी त्यांनी मागणी केली.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयWhatsAppव्हॉट्सअॅप