शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

एएन-32 अपघात: बचाव दलाची हवाई दलाकडून सुखरुप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 8:22 AM

17 दिवसांपासून अडकलेल्या बचाव दलातील सर्वजण सुखरुप

इटानगर: हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध घेताना अडकून पडलेल्या बचाव दलातील 15 जणांची हवाई दलानं सुखरुप सुटका केली आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे. हवाई दलाच्या एएन-32 विमानाला 3 जून रोजी अरुणाचल प्रदेशमध्ये अपघात झाला. यामध्ये विमानातील सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अपघातग्रस्त विमानातील कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी बचाव दल दुर्घटनास्थळी पोहोचलं होतं. मात्र या अपघातात विमानातील सर्वच जण मृत्यूमुखी पडले. त्यामुळे बचाव दलानं सर्व कर्मचाऱ्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. मात्र यानंतर बचाव दल घटनास्थळी अडकून पडलं. यामध्ये हवाई दलाच्या 8, लष्कराच्या 4 कर्मचाऱ्यांचा आणि 3 सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. या सर्वांची शनिवारी एएलएच आणि एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं सुखरुप सुटका करण्यात आली. शिलाँगमधील हवाई दलाचे प्रवक्ते विंग कमांडर रत्नाकर सिंह यांनी ही माहिती दिली. बचाव पथकातील सर्वांची सुटका करण्यास आली असून त्यांची प्रकृती उत्तम असल्याचं सिंह यांनी सांगितलं. 'वातावरण खराब असल्यानं बचाव पथकाला दुर्घटना स्थळावरुन निघण्यास उशीर झाला. शनिवारी वातावरणात थोडी सुधारणा झाली. मात्र तरीही धोका कायम होता. यानंतर बचाव दलाच्या सुटकेसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आली,' अशी माहिती सिंह यांनी दिली. अपघातग्रस्त विमानातील हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचे मृतदेह आणि विमानातील ब्लॅक बॉक्स आणण्यासाठी बचाव दल घटनास्थळी पोहोचलं होतं. सियांग जिल्ह्यातील डोंगराळ भागातून मृतदेह बाहेर काढण्याचं काम 20 जूनला पूर्ण झालं. आसामच्या जोरहाटमधून 3 जूनला एएन 32 विमानानं उड्डाण केलं होतं. मात्र उड्डाणानंतर अवघ्या 33 मिनिटांमध्येच हे विमान बेपत्ता झालं.  

टॅग्स :Accidentअपघातindian air forceभारतीय हवाई दल