शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून डोनाल्ड ट्रम्प यांचा UNGA मध्ये मोठा आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
4
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
5
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
6
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
7
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
8
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
9
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
10
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
11
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
12
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
13
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
14
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
15
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
16
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
17
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
18
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
20
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका

सर्व कर्जबुडव्यांवर लगेच गुन्हे नोंदवा; गय नको, कारवाई सुरू करा : अर्थमंत्रालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 04:35 IST

पंजाब नॅशनल बँकेमध्ये नीरव मोदीने केलेल्या सुमारे १३ हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर अर्थमंत्रालयाने कडक पवित्रा घेत, ऐपत असूनही कर्ज न फेडणा-यांनी किती रक्कम थकविली आहे, याचा विचार न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत.

हरिश गुप्तानवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेमध्ये नीरव मोदीने केलेल्या सुमारे १३ हजार कोटींच्या आर्थिक घोटाळ्यानंतर अर्थमंत्रालयाने कडक पवित्रा घेत, ऐपत असूनही कर्ज न फेडणा-यांनी किती रक्कम थकविली आहे, याचा विचार न करता त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे आदेश बँकांना दिले आहेत. ऐपत असूनही कर्ज न फेडणा-या ७ हजार जणांनी तब्बल ७० हजार कोटी रुपये थकविले आहेत.सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांच्या बुडित कर्जांचा आकडा ३० सप्टेंबर २०१७ पर्यंत ७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचला असल्याचे रिझर्व्ह बँकेने अहवालात म्हटले आहे.ऐपत असूनही कर्ज न फेडणा-यांनी सुमारे १.१ लाख कोटी रुपयांच्या कर्जांची परतफेड केलेलीच नाही. अशा ९ हजार एनपीए प्रकरणांत पैशांची वसुली होण्यासाठी कर्जाची परतफेड न करणा-यांवर बँकांनी बँकेने खटले भरले आहेत. मात्र, खटले भरणे आणि फौजदारी गुन्हे दाखल करणे यात फरक आहे.कोणी किती रक्कम थकविली हे न पाहता, सर्वच कर्जबुडव्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा स्पष्ट आदेश अर्थमंत्रालयाने सर्व सरकारी बँकांना दिला आहे.अजिबात सहानुभूती दाखवू नका-ऐपत असूनही कर्ज न फेडणा-यांबद्दल सहानुभूती बाळगण्याची गरज नाही, तसेच कर्जबुडव्यांवर कारवाई करण्यात अजिबात दिरंगाई होता कामा नये, असे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना वित्तमंत्रालयाने बजावले आहे, तसेच ५0 कोटींहून अधिक कर्जाच्या रकमेची परतफेड न करणा-यांवर, फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही अर्थमंत्रालयाने बँकांना दिल्या आहेत.एसबीआयचा ढिला कारभार-सुमारे ४ लाख कोटी रुपयांची कर्जे थकविणा-या २८ मोठ्या कर्जबुडव्यांकडून ही रक्कम वसूल व्हावी, यासाठी रिझर्व्ह बँकेने आधीच सर्व बँकांना सांगितले आहे, त्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातील १२ प्रकरणांची सुनावणी नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलसमोर सुरू आहे. कर्जवसुलीसाठी या प्रकरणातील कंपन्या लिलावात विकण्यात येतील.ज्या ९ हजार प्रकरणांत बँकांनी कर्जबुडव्यांवर खटले दाखल केले आहेत, त्यातील १,६२४ जणांनी ऐपत असूनही १६६०१.९० कोटी रुपयांच्या कर्जांची परतफेड केलेली नाही. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक आॅफ इंडियाचा याबाबतीत कारभार इतका ढिला आहे की, तिने अशा फक्त १३ प्रकरणांत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे आणि या १३ जणांनी थकविलेली कर्जाची रक्कम फक्त आहे १३.१० कोटी रुपये.कारवाईसाठी बँक संघटनेचा वाढता दबावऐपत असूनही कर्ज बुडविणा-यांवर कारवाई करण्यासाठी आॅल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशनने बँका व सरकारवर टीका केली. ७ हजार बड्या धेंडांनी बँकांकडून घेतलेले कर्ज फेडलेले नाही. या कर्जबुडव्यांना कर्ज पुनर्रचनेच्या नावाखाली सरकार सवलतीच देत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

टॅग्स :bankबँक