शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कॉर्पोरेट शेतीसाठी जमीन खरेदीची रिलायन्सची योजना नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 5:49 AM

कृषी आंदोलनाबाबत जिओने उच्च न्यायालयात दाखल याचिकेत स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कॉर्पोरेट शेतीसाठी पंजाब-हरियाणा अथवा देशात इतरत्र कोठेही जमीन खरेदी करण्याचा आमचा इरादा नसल्याचा खुलासा मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स उद्योग समूहाने केला आहे. तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी रिलायन्स उद्योग समूहाला लक्ष्य केल्यामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी जिओ इन्फोकॉमने पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. त्यात हे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

तीन कृषी कायद्यांचा मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योगपतींना फायदा होणार असून, ते शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करतील, अशी धारणा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी या कायद्यांच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करीत आहेत. आंदोलक शेतकरी या कंपन्यांविरोधात राग व्यक्त करीत आहेत. पंजाबातील रिलायन्स जिओच्या १,५०० पेक्षा अधिक दूरसंचार टॉवरांची आंदोलकांनी मोडतोड केली आहे. कृषी कायदे हे जिओला अनुकूल बनविण्यात आल्याचा आंदोलकांचा समज असून, त्यामुळे त्यांनी जिओवर बहिष्कार टाकला आहे.रिलायन्स आणि तिच्या कोणत्याही उपकंपनीने पंजाब, हरियाणा अथवा देशात इतरत्र कॉर्पोरेट अथवा कंत्राटी शेतीसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या जमीन खरेदी केलेली नाही. भविष्यातही आमची अशी काही योजना नाही.

कंपनीने म्हटले की, आपल्या टॉवरांच्या हानीची सरकारने दखल घ्यावी. हिंसेमुळे आमच्या हजारो कर्मचाऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आवश्यक प्रवास, विक्री आणि सेवा यांत बाधा निर्माण झाली आहे.

नाव जोडले गेल्याने प्रतिष्ठा झाली कमीरिलायन्सने म्हटले की, कृषी कायद्यांशी आमचा कोणताही संबंध नाही. या कायद्यांशी आमचे नाव जोडून आमचा व्यवसाय आणि प्रतिष्ठेचे नुकसान केले जात आहे. या कायद्यांचा कंपनीला कोणत्याही प्रकारचा लाभ नाही. रिलायन्स रिटेल आणि जिओ इन्फोकॉम यांच्याशी संबंधित कोणतीही कंपनी ‘कॉर्पोरेट’ अथवा ‘कंत्राटी’ शेती करीत नाही. नजीकच्या भविष्यातही कंपनीचा असा कोणताही इरादा नाही.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीReliance Jioरिलायन्स जिओ