शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारात प्रभावी? हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 14:58 IST

Corona Virus News : आदिवासी बहुल भागामध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये लवकरत वापरण्यात येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देदेशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर इलाज म्हणून करतातओदिशा हायकोर्टाने या चटणीच्या औषधी उपयोगाबाबतचा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला आहेही याचिका इंजिनियर नयाधर पाढियाल यांनी दाखल केली होती

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी जगभरातील नामांकित कंपन्यांनी अनेक लसी विकसित केल्या आहेत. मात्र भारतात कोरोनावरील विविध मार्गांनी उपचारांच्या बातम्या येत असतात. आता ओदिशा आणि छत्तीसगडमधील आदिवासी बहुल भागामध्ये खाण्यात येणारी लाल मुंग्यांची चटणी कोरोनाविरोधातील उपचारांमध्ये लवकरत वापरण्यात येण्याची शक्यता आहे. आयुष मंत्रालय लवकरच या चटणीला कोरोना विषाणूविरोधातील औषध म्हणून मान्यता देण्याची शक्यता आहे. याबाबत ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालयाला तीन महिन्यात चौकशी करून निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ओदिशा हायकोर्टाने आयुष मंत्रालय आणि कौन्सिल ऑफ सँटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या महासंचालकांना याबाबत लवकरच निर्णय घेण्याची सूचना केली आहे. याबाबत तीन महिन्यात निर्णय घ्यावा, असे हायकोर्टाने म्हटले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे देशातील अनेक राज्यांमध्ये आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर इलाज म्हणून करतात.या लाल मुंग्यांच्या चटणीमध्ये लाल मुंग्या आणि हिरव्या मिरच्यांचा समावेश असतो. ओदिशा हायकोर्टाने या चटणीच्या औषधी उपयोगाबाबतचा आदेश एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना दिला आहे. या जनहित याचिकेमध्ये लाल चटणीच्या औषधी प्रभावाबाबत माहिती घेण्यासाठी काहीच पावले उचलण्यात येत नसल्याची न्यायालयाने दखल घ्यावी अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली होती.ही याचिका इंजिनियर नयाधर पाढियाल यांनी दाखल केली होती. यापूर्वी पाढियाल यांनी कोरोनाविरोधात लाल मुंग्यांच्या चटणीच्या वापराबाबत सूचना केली होती. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली. पाढियाल यांच्या मते, या चटणीमध्ये फॉर्मिक अ‍ॅसिड, प्रोटिन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२, झिंक आणि लोह यांचा समावेश असतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. ओदिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, आसाम, हिमाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मेघालय येथील आधिवासी लाल मुंग्या खातात. तसेच अनेक आजारांवर उपचारांमध्ये त्याचा वापर करतात. त्यामुळेच आदिवासी भागात कोरोनाचा तितकासा फैलाव झाला नाही, असा दावा त्यांनी केला.

 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यHigh Courtउच्च न्यायालय