शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

हरयाणात बंडखोरांनी वाढविली भाजप, काँग्रेसची काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2019 1:24 AM

हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.

चंदीगड : हरयाणात विधानसभा निवडणुकीत सतारूढ भाजप आणि विरोधी पक्ष काँग्रेससाठी बंडखोर डोकेदुखी ठरत आहेत. अनेक बंडखोर अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. राज्यात २१ रोजी मतदान होणार आहे.रेवाडीतील भाजपचे विद्यमान आमदार रणधीर कापडीवास यांनी सांगितले की, आपण अपक्ष निवडणूक लढविणार आहोत. गुडगावचे भाजप आमदार उमेश अग्रवाल यांनी पत्नी अनिता यांना अपक्ष म्हणून मैदानात उतरविले आहे. देवीलाल यांचे चिरंजीव आणि काँग्रेसचे नेते रणजित सिंह चौटाला तिकीट न मिळाल्याने रानियामधून अपक्ष निवडणूक लढवीत आहेत. काही मतदारसंघ असे आहेत ज्या ठिकाणी बंडखोर थेट निवडणुकीत उतरले नाहीत; पण त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरुद्ध बंडाचे निशाण फडकाविले आहे. भाजपने कापडीवास यांच्याविरुद्ध सुनील मुसेपूर यांना तिकीट दिले आहे. आपण निवडणूक का लढवीत आहात? असे विचारले असता कापडीवास म्हणाले की, मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे; पण मला कोणत्या गोष्टीची किंमत चुकवावी लागत आहे ते माहीत नाही. या मतदारसंघात एका बाहेरच्या उमेदवाराला तिकीट देण्यात आले तेव्हा समर्थकांनी मला आग्रह केला की, आपण निवडणूक लढायला पाहिजे. भाजपने विद्यमान ४८ आमदारांपैकी १२ जणांना उमेदवारी नाकारली आहे. भाजप आणि काँग्रेसशिवाय इंडियन नॅशनल लोकदल, शिरोमणी अकाली दल, जननायक जनता पाटी, बहुजन समाज पाटी, आम आदमी पाटी, स्वराज इंडिया निवडणूक मैदानात आहेत.अशोक तंवर यांचा राजीनामाकाँग्रेसच्या गोटातही अंतर्गत कलह आहे. प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अशोक तंवर यांनी हरयाणातील तिकीट वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तंवर यांनी शनिवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. निवडणुकीच्या काही दिवस अगोदर तंवर यांना हटवून पक्षाने कुमारी शैलजा यांना पक्षाच्या राज्य शाखेचे प्रमुख बनविले होते.काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठविलेल्या राजीनाम्यात तंवर यांनी म्हटले आहे की, पक्षाला संपविण्याचा कट केला जात आहे. एका वृत्तसंस्थेला बोलताना ते म्हणाले की, आपल्यासमोर पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा