शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
3
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
4
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
5
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
6
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
7
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
8
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
9
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
10
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
11
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
12
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
13
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
14
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
15
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
16
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
17
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
18
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
19
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
20
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!

‘नीट’च्या ग्रेसमार्कची फेरतपासणी, चार जणांची समिती गठित, नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेत १५०० हून अधिक जणांना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2024 05:52 IST

'NEET' Exam News: नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली.

 नवी दिल्ली - नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची फेरतपासणी करण्यासाठी केंद्रीय शिक्षण खात्याने चार सदस्यांची एक समिती नेमली आहे, अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) शनिवारी दिली. या परीक्षेतील गुणवाढीबद्दल अनेक आरोप झाले होते. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेले बदल तसेच परीक्षा केंद्रांमध्ये काही कारणांनी वाया गेलेला वेळ या गोष्टींमुळे दिलेले वाढीव गुण ही विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळण्यामागची काही कारणे आहेत. मात्र नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार झालेले नाहीत, असे एनटीएने सांगितले. नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गैरव्यवहारांची सर्वोच्च न्यायालयाच्या  देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे, तर या परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा काँग्रेसने दावा केला होता.

अन्य परीक्षार्थींना बसणार फटका : काँग्रेसविविध परीक्षांमध्ये पेपर फुटणे, हेराफेरी, भ्रष्टाचार या गोष्टी घडतात असे काँग्रेसने म्हटले आहे. भाजप युवकांची फसवणूक करत असून, त्यांच्या भविष्याशी खेळत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. सहा परीक्षा केंद्रांवर काही कारणांनी दिलेला वाया गेल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले. त्यामुळे त्यांचे गुण वाढले. त्यामुळे अन्य परीक्षार्थींच्या भविष्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचा दावा होत आहे. मेघालय, हरयाणातील बहादुरगड, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि बलोध, गुजरातमधील सुरत आणि चंडीगड येथे ती सहा केंद्रे आहेत. 

पुन्हा परीक्षा घेण्याची  विद्यार्थ्यांची मागणी- नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गुणवाढीमुळे यंदा वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया काहीशी कठीण होणार आहे. निकालामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. - त्यामुळे या परीक्षेचा निकाल रद्द करावा व पुन्हा परीक्षा घ्यावी, अशी मागणी काही परीक्षार्थींनी केली आहे. नीट-यूजी वैद्यकीय परीक्षा पुन्हा घ्यायची का याचा निर्णय चार सदस्यीय समिती जो अहवाल देईल त्यातील शिफारसींवर अवलंबून राहील, असे एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. '

प्रवेशप्रक्रियेवर परिणाम नाही : एनटीए महासंचालकवैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल ४ जून रोजी जाहीर करण्यात आला. ६७ विद्यार्थ्यांना या परीक्षेत प्रथमश्रेणी मिळाली. त्यात हरयाणातील सहा जणांचा समावेश होता. यंदा या परीक्षेला २४ लाख विद्यार्थी बसले. ही विक्रमी संख्या आहे. एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह म्हणाले की, १५००हून अधिक विद्यार्थ्यांना मिळालेल्या ग्रेस मार्क्सची तपासणीसाठी यूपीएससीचे माजी चेअरमन यांचा समावेश असलेल्या चार सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ग्रेस मार्क दिल्यामुळे नीट-यूजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या पात्रता निकषांवर कोणताही परिणाम झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या गुणांच्या फेरतपासणीचा प्रवेशप्रक्रियेवर परिणाम होणार नाही, असेही सुबोधकुमार सिंह म्हणाले.

टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकालEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी