शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

काँग्रेसला बुडवूनही राहुल गांधी सुधारले नाहीत : रविशंकर प्रसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 5:28 PM

राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे, असही प्रसाद म्हणाले.

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतरही राहुल गांधी सुधारले नसल्याची टीका प्रसाद यांनी केली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तरी देखील काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यात सुधारणा झाली नसल्याचे प्रसाद म्हणाले. राहुल सध्या वायनाड दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी मोदींवर निशाना साधला. मी कठोर शब्दांचा वापर करतो, परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी राग आणि द्वेष निर्माण करून देशातील नागरिकांना विभागण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राहुल यांनी म्हटले होते.

काँग्रेस पक्ष म्हणजे बंधुभाव आणि सत्याचं रूप आहे. मात्र नरेंद्र मोदी खोटं आणि द्वेषाच्या जोरावर देशावर राज्य करत आहेत. भाजपच्या खोटेपणाविरुद्ध काँग्रेसची लढाई सुरूच राहिल, असंही राहुल म्हणाले. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्या टीकेचा समाचार घेतला. तसेच पराभवानंतर तरी सुधारणा करा, असा टोला लगावला. तसेच राहुल यांनी जनतेच्या भावनेचा तरी आदर करावा. १५ राज्यांमध्ये भाजपला ५० टक्क्यांहून अधिक मते मिळाली आहेत. ज्यांनी मते दिले नाहीत, त्यांच्यासाठी देखील भाजप काम करणार आहे. जनतेला मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे ते म्हणाले. यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी यावेळी राममंदिरा संदर्भातील शिवसेनेच्या भूमिकेचे समर्थन केले.