शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

'रामनाथ कोविंदही बायोडेटा घेऊन आलेले; शांत बसले म्हणून राष्ट्रपती झाले'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 3:00 PM

उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

नवी दिल्ली : उत्तर पश्चिम दिल्लीमधून भाजपाचे खासदार असलेले उदित राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या 24 तासांपासून सुरु असलेल्या घडामोडींनंतर त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी भाजपावर तोंडसुख घेत त्यांना दलितांची मते हवी मात्र दलित नेता नको असा आरोप केला. 

यावेळी त्यांनी भाजपाने जर तिकीट दिले असते तर त्यांच्याकडून लढलो असतो असे कबुलही केले. 2 एप्रिल 2018 मध्ये जेव्हा दलित रस्त्यांवर उतरले होते, तेव्हा मी त्यांना समर्थन दिले होते. या कारणावरून माझे तिकिट कापल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच 2014 मध्ये सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्याकडे बायोडेटा आले होते. माझ्यासाठी काहीतरी करा असे ते सांगत होते. त्यानाही निवडणुकीचे तिकिट हवे होते, मात्र दिले नाही. यावर ते शांत बसले म्हणून त्यांना राष्ट्रपती पद देण्यात आले. मी देखिल शांत बसलो असतो तर मलाही पंतप्रधान बनवले असते. मात्र, मी मुका आणि बहिरा बनून राहू शकत नाही, असा आरोपही त्यांनी केला. 

यापूर्वी त्यांनी ट्विटर खात्यावर लिहिले की जर मला आधीच सांगितले असते तर एवढा ताप झाला नसता. पक्षावर अशी का वेळ आली की अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी एक वाजता उमेदवारी घोषित करण्यात आली. आधीच सांगितले असते तर एवढा त्रास झालाच नसता. भाडेकरू आहे, ऐकावेच लागेल.

लोकसभेचे तिकिट मिळत नसल्याचे पाहून नाराज झालेल्या उदित राज यांनी मै भी चौकीदार अभियानावेळी ट्विटरवरील नावापुढे चौकीदार लिहिले होते. मात्र, काल त्यांनी नावापुढील चौकीदार काढून टाकले होते. नाराजी व्यक्त होताच प्रसारमाध्यमांमध्ये बोभाटा झाल्यानंतर त्यांनी पुन्हा नावापुढे चौकीदार लिहिले होते. भाजपाकडून आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा चौकीदार लिहिले असल्याची चर्चा होती. 

उत्तर-पश्चिम दिल्लीमधून त्यांचे तिकिट कापून गायक हंस राज हंस यांना देण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता उदित राज यांना पुन्हा तिकिट न देणे भाजपाने ठरविलेले होते. उदित राज यांनीही काल सकाळी जर तिकिट न मिळाल्यास भाजपा सोडण्याची धमकी दिली होती. बुधवारी सकाळी असेच झाले. 

टॅग्स :north-east-delhi-pcउत्तर पूर्व दिल्लीBJPभाजपाcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी