शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:56 IST

रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले

ठळक मुद्देनलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे.भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या.भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी

नलगोंडा – एकीकडे सगळ्या देशात रक्षाबंधनानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. सोशल मीडियावर बहिण भावाला राखी बांधतानाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील परंतु एक फोटो असा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल. नकळत डोळ्यातील अश्रू तुम्हाला भावनिक करतील. या फोटोमागची कहाणी ह्दयद्रावक आहे.

तेलंगानातील नलगोंडा येथे ५ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली परंतु राखी बांधणारा हात कधीच बहिणीच्या आशीर्वाद देण्यासाठी उचलणार नाही. रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे. याठिकाणी ५० वर्षीय चिंतापल्ली लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचं रविवारी निधन झालं.

चिंतापल्ली लक्ष्मण अनेक दिवसांपासून आजारी होता. रविवारी एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता. भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या. भावाच्या निधनाची बातमी कळताच बहिणींना मोठा धक्काच बसला. आपला भाऊ आता कधीच परतणार नाही यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु बहिणींना अंत्यसंस्कारावेळी भावाचा हात रिकामा ठेवला नाही. भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी. भावाच्या पार्थिवावर राखी बांधताना बहिणींचे ते दृश्य पाहून प्रत्येक ह्दय पिळवटून टाकणारं होतं.

BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेले चिरंजीलाल यांचे स्वातंत्र्य दिनी निधन झाले. ह्रदयविकाराच तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार चीता थंड करण्यासाठी त्रिपादुका अन् अस्थीकलश ठेवण्यात आला होता. चिरंजीलाल यांच्या बहिणीने या अस्थीकलशालाच राखी बांधली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन