शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:56 IST

रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले

ठळक मुद्देनलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे.भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या.भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी

नलगोंडा – एकीकडे सगळ्या देशात रक्षाबंधनानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. सोशल मीडियावर बहिण भावाला राखी बांधतानाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील परंतु एक फोटो असा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल. नकळत डोळ्यातील अश्रू तुम्हाला भावनिक करतील. या फोटोमागची कहाणी ह्दयद्रावक आहे.

तेलंगानातील नलगोंडा येथे ५ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली परंतु राखी बांधणारा हात कधीच बहिणीच्या आशीर्वाद देण्यासाठी उचलणार नाही. रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे. याठिकाणी ५० वर्षीय चिंतापल्ली लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचं रविवारी निधन झालं.

चिंतापल्ली लक्ष्मण अनेक दिवसांपासून आजारी होता. रविवारी एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता. भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या. भावाच्या निधनाची बातमी कळताच बहिणींना मोठा धक्काच बसला. आपला भाऊ आता कधीच परतणार नाही यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु बहिणींना अंत्यसंस्कारावेळी भावाचा हात रिकामा ठेवला नाही. भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी. भावाच्या पार्थिवावर राखी बांधताना बहिणींचे ते दृश्य पाहून प्रत्येक ह्दय पिळवटून टाकणारं होतं.

BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेले चिरंजीलाल यांचे स्वातंत्र्य दिनी निधन झाले. ह्रदयविकाराच तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार चीता थंड करण्यासाठी त्रिपादुका अन् अस्थीकलश ठेवण्यात आला होता. चिरंजीलाल यांच्या बहिणीने या अस्थीकलशालाच राखी बांधली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन