शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

Raksha bandhan: भावाच्या मृतदेहाला राखी बांधून ५ बहिणींनी दिला निरोप; मनाला वेदना देणारं दृश्य पाहून गाव हळहळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 16:56 IST

रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले

ठळक मुद्देनलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे.भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या.भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी

नलगोंडा – एकीकडे सगळ्या देशात रक्षाबंधनानिमित्त उत्साहाचं वातावरण होतं. सोशल मीडियावर बहिण भावाला राखी बांधतानाचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील परंतु एक फोटो असा आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी येईल. नकळत डोळ्यातील अश्रू तुम्हाला भावनिक करतील. या फोटोमागची कहाणी ह्दयद्रावक आहे.

तेलंगानातील नलगोंडा येथे ५ बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली परंतु राखी बांधणारा हात कधीच बहिणीच्या आशीर्वाद देण्यासाठी उचलणार नाही. रक्षाबंधनांच्या दिवशीच बहिणींना सोडून भाऊ निघून गेला. मृत भावाच्या हातावर राखी बांधणारे दृश्य पाहून उपस्थित गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. नलगोंडा तालुक्यातील मडगुलापल्ली येथील गावातील ही घटना आहे. याठिकाणी ५० वर्षीय चिंतापल्ली लक्ष्मण नावाच्या व्यक्तीचं रविवारी निधन झालं.

चिंतापल्ली लक्ष्मण अनेक दिवसांपासून आजारी होता. रविवारी एकीकडे रक्षाबंधनाचा सण साजरा केला जात होता. भावाला राखी बांधण्यासाठी चिंतापल्ली यांच्या ५ बहिणी प्रतिक्षा करत होत्या. भावाच्या निधनाची बातमी कळताच बहिणींना मोठा धक्काच बसला. आपला भाऊ आता कधीच परतणार नाही यावर कुणालाही विश्वास बसत नव्हता. परंतु बहिणींना अंत्यसंस्कारावेळी भावाचा हात रिकामा ठेवला नाही. भावासाठी खरेदी केलेली राखी त्याच्या मृतदेहाला बांधावी लागेल याची कल्पनाही कुणी केली नसावी. भावाच्या पार्थिवावर राखी बांधताना बहिणींचे ते दृश्य पाहून प्रत्येक ह्दय पिळवटून टाकणारं होतं.

BSF जवानाच्या अस्थीकलशालाच बांधली राखी

राजस्थानच्या हरसौर जिल्ह्यातील नागौर येथील हा फोटो देशावीसायांच्या काळजाचं पाणी पाणी करतोय. कारण, रक्षाबंधन सणाच्या 4 दिवसांपूर्वीच भावाचे निधन झाल्यामुळे चक्क अस्थीकलशालाच राखी बांधून बहिणीने बहिण-भावाचं नातं अमर केलं. बीएसएफमध्ये हेड कॉन्स्टेबल असलेले चिरंजीलाल यांचे स्वातंत्र्य दिनी निधन झाले. ह्रदयविकाराच तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. 17 ऑगस्ट रोजी त्यांच्या हरसौर या मूळगावी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परंपरेनुसार चीता थंड करण्यासाठी त्रिपादुका अन् अस्थीकलश ठेवण्यात आला होता. चिरंजीलाल यांच्या बहिणीने या अस्थीकलशालाच राखी बांधली.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधन