शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची हिंमत पोलिसांमध्ये नाही; राकेश टिकैत यांची टीका

By देवेश फडके | Updated: February 26, 2021 10:50 IST

वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीतील सीमांवर आंदोलन (Farmers Protest) करीत आहेत. अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे समर्थन या आंदोलनाला मिळावे, यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांतील किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देट्रॅक्टर बॅरिकेट तोडण्यासाठीच असतात - राकेश टिकैतशेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची पोलिसांमध्ये हिंमत नाही - राकेश टिकैतएप्रिलमध्ये पुन्हा आंदोलनासाठी दिल्लीला यायचे - राकेश टिकैत

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी दिल्लीतील सीमांवर आंदोलन (Farmers Protest) करीत आहेत. अद्यापही यावर तोडगा निघालेला नाही. देशभरातील शेतकऱ्यांचे समर्थन या आंदोलनाला मिळावे, यासाठी भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) विविध राज्यांतील किसान महापंचायतींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना संबोधित करत आहेत. यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. शेतकऱ्यांची लढाई सरकारशी नसून, देशाला लुटणाऱ्यांविरोधात आहे, असा दावा त्यांनी केला. (rakesh tikait gave challenge to the police to stop tractors)

ट्रॅक्टर हे बॅरिकेट तोडण्यासाठीच असतात. शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर रोखण्याची पोलिसांमध्ये हिंमत नाही, असा दावा करत शेतकऱ्यांची लढाई सरकारशी नसून, देश लुटणाऱ्यांविरोधात आहे. ते भुकेचा व्यापार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, आम्ही तसे होऊ देणार नाही, असे राकेश टिकैत यांनी म्हटले. 

ज्या शेतकऱ्यांकडे जमिनी नाहीत, त्यांच्यासाठी देखील ही लढाई आहे. दिल्लीला चारही बाजूंनी शेतकऱ्यांचा वेढा आहे. मात्र, तरीही याबाबत कोणताही तोडगा निघालेला नाही, असे टिकैत यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांसाठी पीके महत्त्वाची आहेत. आता पीके काढून घ्या. एप्रिलमध्ये पुन्हा आंदोलनासाठी दिल्लीला यायचे आहे. ट्रॅक्टरमध्ये मुबलक प्रमाणात डिझेल भरून ठेवा. जेव्हा सांगितले जाईल, तेव्हा दिल्लीकडे कूच करा. आपल्या जमिनी वाचवायच्या असतील, तर आंदोलनात सक्रीय सहभाग आवश्यक आहे, असे आवाहन राकेश टिकैत यांनी केले. 

साेशल मीडिया, ओटीटी, न्यूज पाेर्टल्सवर निर्बंध; कंपन्यांना द्यावी लागेल सरकारला माहिती

इंधनदरवाढीवर टीका

देशात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वधारत आहेत. मात्र, सरकार यासंदर्भात काहीही करत नाही. शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत दिली जात नाही. भांडवलदार छोट्या दुकानदारांच्या पोटावर पाय आणण्याचे काम करत आहेत, असा आरोप करत बड्या कंपन्यांची स्पर्धा करावी लागेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची सबसिडी सोडण्याचे आवाहन केले जाते. तसेच खासदार आणि आमदारांना पेन्शन सोडण्याचे आवाहन सरकार का करत नाही, असा सवाल राकेश टिकैत यांनी केला आहे. 

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनrakesh tikaitराकेश टिकैतdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस