शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

Farmers Protest: “मोदी आणि योगी यांना मत देऊन मोठी चूक केली”; टिकैत यांनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 3:44 PM

शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे.

ठळक मुद्देविविध मागण्यांसह ८१ गावातील शेकडो शेतकऱ्यांचे नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलनआंदोलनकर्त्यांवर कारवाई करत पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना केली अटक

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्याविरोधात गेल्या ८ महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. शेतकरी नेते आणि केंद्रातील मोदी सरकार दोन्ही आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. काही महिन्यांपूर्वी चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी ८१ गावातील शेतकऱ्यांनी नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलन केले. या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यावरून शेतकरी नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन मोठी चूक केली, असे म्हटले आहे. (rakesh tikait brother naresh tikait said we are guilty pm modi and yogi vote was given)

TATA ला जमलं नाही ते Reliance ने केलं! ‘या’ कंपनीवरील अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण; पाहा, डिटेल्स

विविध मागण्यांसह ८१ गावातील शेकडो शेतकऱ्यांनी नोएडा प्राधिकरणासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी मोठा फौजफाटा तयार तैनात करण्यात आला होता. या आंदोलनकर्त्यांवर कारवाई करत पोलिसांनी शेकडो शेतकऱ्यांना अटक केली. यानंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी संताप व्यक्त केला असून, आम्हीही गुन्ह्यात सहभागी झालो. आम्हीही तितेकच दोषी आहोत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मत देऊन चूक केली, या शब्दांत केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवज्योत सिंग सिद्धूंना हायकमांडची सक्त ताकीद; राहुल आणि प्रियंका गांधी म्हणाले की...

भारत बंदचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे सदर भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. भारतीय किसान परिषदेच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी नोएडा प्राधिकरणासमोर जमले. पोलिसांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते. या आंदोलना महिला शेतकऱ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. याआधी बुधवार आणि गुरुवारी पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांना अटक केली होती, अशी माहिती मिळाली आहे. संयुक्त किसान मोर्चाने २५ सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले असून, डाव्या पक्षांनी याला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. 

“तालिबान दहशतवादी संघटना आहे की नाही? मोदी सरकारने स्पष्ट करावे”: ओमर अब्दुल्ला

दरम्यान, राकेश टिकैत यांचे सहकारी गुरनाम सिंग चदूनी यांनी मोदी सरकारला थेट सवाल केला आहे. ५० हजार, ५ ते १० लाख शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाला घेरले, तर यांच्याकडे दुसरा काय पर्याय शिल्लक राहील, अशी रोखठोक विचारणा केली आहे. आतापर्यंत शेतकरी आंदोलनासाठी सुमारे ६५० शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे. ३७ हजार शेतकऱ्यांवर गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. आता मागण्या मान्य करण्याचे दोनच मार्ग आहेत. संपूर्ण देशात भाजपला पराभूत करायचे, असे सांगत मात्र, नवीन सरकार आपल्या मागण्या मान्य करेल का, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे, अशी शंका गुरनाम सिंग यांनी व्यक्त केली. तसेच शेतकरी आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. मोदी सरकारला आमचे म्हणणे मान्य करावेच लागेल. परंतु, भाजप सरकार गेल्यानंतर आपले म्हणणे ऐकले जाईल का, याबाबत साशंकता वाटते, असे सिंग यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीyogi adityanathयोगी आदित्यनाथCentral Governmentकेंद्र सरकारUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण