शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

राजर्षी शाहू महाराज हेच सामाजिक न्यायाचे जनक, राहुल गांधी यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:55 IST

जातगणना करावी, आरक्षणाची मर्यादा उठवावी !

कोल्हापूर : कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक निर्णयाने सामाजिक न्याय देण्याची संकल्पना प्रत्यक्षात अवतरली. तेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे जनक आहेत, असे प्रतिपादन लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले आहे.राजर्षी शाहू महाराज यांनी १२२ व्या वर्षी २६ जुलै १९०२ राेजी काेल्हापूर संस्थानच्या नाेकरीत पन्नास टक्के मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा तसेच सर्वांना माेफत शिक्षण सक्तीचे करणारा हुकूमनामा काढला हाेता. त्या निर्णयाचे क्रांतिकारी संकल्पना असे वर्णन करीत राहुल गांधी यांनी शनिवार, २६ जुलै १९०२ राेजी प्रसिद्ध केलेल्या ‘करवीर सहकारचें ग्याझिट’च्या चित्रफितीसह ट्वीट केले आहे.

ते पुढे म्हणतात की, सर्वांसाठी शिक्षण आणि पन्नास टक्के आरक्षण या क्रांतिकारक निर्णयातूनच काॅंग्रेस पक्षाने जातनिहाय गणना करण्याची मागणी करीत आहे. शिवाय समाजातील इतर उपेक्षित, मागास घटकांना आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी काॅंग्रेस करीत आहे. आमचे सरकार आले असते तर हा निर्णय घेऊन मराठा, धनगर आदी समाजाला न्याय देता आला असता.राजर्षी शाहू महाराज यांचे माेठेपण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणतात, शंभर वर्षांपूर्वी सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रारंभीच्या काळात प्रेरणा देण्याचे कामही राजर्षी शाहू महाराज यांनीच केले. त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळे डाॅ. आंबेडकर यांनी आरक्षणाची राज्यघटनेत अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याची तरतूद केली. राजर्षी शाहू महाराज यांचा क्रांतीचा विचार डाॅ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतात अमलात आणला.काॅंग्रेस पक्षाने राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी संकल्पनांच्या आधारेच उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी जातनिहाय गणना करून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, तसेच आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण वाढवू नये, ही अट शिथिल करण्याचा निर्णयही काॅंग्रेसने घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरreservationआरक्षणRahul Gandhiराहुल गांधी