शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

राजर्षी शाहू महाराज हेच सामाजिक न्यायाचे जनक, राहुल गांधी यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:55 IST

जातगणना करावी, आरक्षणाची मर्यादा उठवावी !

कोल्हापूर : कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक निर्णयाने सामाजिक न्याय देण्याची संकल्पना प्रत्यक्षात अवतरली. तेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे जनक आहेत, असे प्रतिपादन लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले आहे.राजर्षी शाहू महाराज यांनी १२२ व्या वर्षी २६ जुलै १९०२ राेजी काेल्हापूर संस्थानच्या नाेकरीत पन्नास टक्के मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा तसेच सर्वांना माेफत शिक्षण सक्तीचे करणारा हुकूमनामा काढला हाेता. त्या निर्णयाचे क्रांतिकारी संकल्पना असे वर्णन करीत राहुल गांधी यांनी शनिवार, २६ जुलै १९०२ राेजी प्रसिद्ध केलेल्या ‘करवीर सहकारचें ग्याझिट’च्या चित्रफितीसह ट्वीट केले आहे.

ते पुढे म्हणतात की, सर्वांसाठी शिक्षण आणि पन्नास टक्के आरक्षण या क्रांतिकारक निर्णयातूनच काॅंग्रेस पक्षाने जातनिहाय गणना करण्याची मागणी करीत आहे. शिवाय समाजातील इतर उपेक्षित, मागास घटकांना आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी काॅंग्रेस करीत आहे. आमचे सरकार आले असते तर हा निर्णय घेऊन मराठा, धनगर आदी समाजाला न्याय देता आला असता.राजर्षी शाहू महाराज यांचे माेठेपण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणतात, शंभर वर्षांपूर्वी सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रारंभीच्या काळात प्रेरणा देण्याचे कामही राजर्षी शाहू महाराज यांनीच केले. त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळे डाॅ. आंबेडकर यांनी आरक्षणाची राज्यघटनेत अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याची तरतूद केली. राजर्षी शाहू महाराज यांचा क्रांतीचा विचार डाॅ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतात अमलात आणला.काॅंग्रेस पक्षाने राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी संकल्पनांच्या आधारेच उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी जातनिहाय गणना करून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, तसेच आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण वाढवू नये, ही अट शिथिल करण्याचा निर्णयही काॅंग्रेसने घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरreservationआरक्षणRahul Gandhiराहुल गांधी