शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

राजर्षी शाहू महाराज हेच सामाजिक न्यायाचे जनक, राहुल गांधी यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 12:55 IST

जातगणना करावी, आरक्षणाची मर्यादा उठवावी !

कोल्हापूर : कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या ऐतिहासिक निर्णयाने सामाजिक न्याय देण्याची संकल्पना प्रत्यक्षात अवतरली. तेच खऱ्या अर्थाने सामाजिक न्यायाचे जनक आहेत, असे प्रतिपादन लाेकसभेतील विराेधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले आहे.राजर्षी शाहू महाराज यांनी १२२ व्या वर्षी २६ जुलै १९०२ राेजी काेल्हापूर संस्थानच्या नाेकरीत पन्नास टक्के मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा तसेच सर्वांना माेफत शिक्षण सक्तीचे करणारा हुकूमनामा काढला हाेता. त्या निर्णयाचे क्रांतिकारी संकल्पना असे वर्णन करीत राहुल गांधी यांनी शनिवार, २६ जुलै १९०२ राेजी प्रसिद्ध केलेल्या ‘करवीर सहकारचें ग्याझिट’च्या चित्रफितीसह ट्वीट केले आहे.

ते पुढे म्हणतात की, सर्वांसाठी शिक्षण आणि पन्नास टक्के आरक्षण या क्रांतिकारक निर्णयातूनच काॅंग्रेस पक्षाने जातनिहाय गणना करण्याची मागणी करीत आहे. शिवाय समाजातील इतर उपेक्षित, मागास घटकांना आरक्षण देण्यासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा हटविण्याची मागणी काॅंग्रेस करीत आहे. आमचे सरकार आले असते तर हा निर्णय घेऊन मराठा, धनगर आदी समाजाला न्याय देता आला असता.राजर्षी शाहू महाराज यांचे माेठेपण स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणतात, शंभर वर्षांपूर्वी सामाजिक न्यायाची संकल्पना त्यांनी मांडली आणि त्यासाठी क्रांतिकारी निर्णय घेतले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रारंभीच्या काळात प्रेरणा देण्याचे कामही राजर्षी शाहू महाराज यांनीच केले. त्यांच्या विचाराच्या प्रभावामुळे डाॅ. आंबेडकर यांनी आरक्षणाची राज्यघटनेत अनुसूचित जाती-जमातींना आरक्षण देण्याची तरतूद केली. राजर्षी शाहू महाराज यांचा क्रांतीचा विचार डाॅ. आंबेडकर यांनी स्वतंत्र भारतात अमलात आणला.काॅंग्रेस पक्षाने राजर्षी शाहू महाराज यांच्या क्रांतिकारी संकल्पनांच्या आधारेच उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी जातनिहाय गणना करून सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास राहिलेल्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आहे, तसेच आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण वाढवू नये, ही अट शिथिल करण्याचा निर्णयही काॅंग्रेसने घेतला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरreservationआरक्षणRahul Gandhiराहुल गांधी