शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

'इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर...' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 3:35 PM

विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी पुन्हा भारताचे पंतप्रधान झाल्यास चांगले होईल असं विधान केलं होतं त्यानंतर या विधानावरुन विरोधकांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदींचा इतका पुळका का असा सवाल उपस्थित केला होता. यावर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

जर इमरान खान यांचे खरचं मोदींवर प्रेम असेल तर पाकिस्तानच्या जमिनीवर दहशतवादाचा उगम होणार नाही, दहशतवाद्यांना थारा देण्याचं काम पाकिस्तान करणार नाही. दहशतवादाचा मुळासकट उखडून काम पाकिस्तान करेल असं विधान केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. 

यावेळी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या जमिनीवर दहशतवादाला बळ देऊ नये. पाकिस्तान दहशतवादाचा प्रश्न सोडविण्यासाठी गंभीरतेने विचार करत असेल तर भारतदेखील पाकिस्तानला दहशतवादाचा सामना करण्यासाठी मदत करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

दहशतवाद दहशतवादच असतो. त्याला जाती, धर्म आणि प्रांत असा काही नसतं. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आम्ही जागतिक पातळीवर राष्ट्रांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र काँग्रेसने आमच्या दहशतवादाच्या लढाईला कमकुवत केलं आहे. जवानांच्या धाडसावर, ध्येर्याचे कौतुक करणं गुन्हा आहे का? फक्त निवडणुकीच्या वेळी नाही तर आम्ही प्रत्येकवेळी जवानांच्या पराक्रमेचं कौतुक करतो. भाजपाने कधीच कोणाच्या देशभक्तीवर संशय घेतला नाही असंही राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

गेल्या वर्षी पाकिस्तानात सत्तांतर झाले. त्यानंतर पाकिस्तान आणि भारत याच्यातील संबंध सुधारतील, तसेच काश्मीरमुद्दा निकाली निघेल, अशी शक्यता निर्माण आली होती. मात्र काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध पुन्हा बिघडले आहेत. एवढंच काय, तर भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यात आले. महिनाभरापूर्वी परदेशी पत्रकारांनी भारतातील लोकसभा निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं? असा प्रश्न इमरान खान यांना विचारला होता. त्यावेळी भारत-पाक या दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी आणि काश्मीर मुद्द्याचं निरसन करण्यासाठी निवडणुकीनंतर भारतात नरेंद मोदी पुन्हा पंतप्रधान बनले तर चांगले राहील असं वक्तव्य केलं होतं.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारतTerrorismदहशतवाद