शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

राजस्थानमध्ये बालविवाहाचीही होणार नोंदणी, विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:21 IST

child marriages: विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले.

जयपूर - विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले. आता राज्यातील प्रत्येक विवाहाची नोंदणी अनिवार्य असेल. मग तो विवाह वैध असो वा अवैध. (child marriages) या विधेयकाबाबतच्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षासह अपक्ष आमदार संयम लोढा यांनी त्याला तीव्र विरोध केला. तसेच विधेयकाला जनमत पाहण्यासाठी परिचालित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाची मागणी फेटाळून लावत हे विधेयक सभागृहात आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत मत विभाजनाची मागणी केली. मात्र ती फेटाळण्यात आली. अखेर विरोधी पक्षांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला आणि सभागृहातून वॉक आऊट केला. (Rajasthan will also register child marriages, the bill passed amid opposition turmoil)  

विधेयकावरील चर्चेत बोलताना आमदार अशोक लाहोटी यांनी सांगितले की, यावरून असे वाटते की सरकार बाल विवाहाला परवानगी देत आहे. जर हे विधेयक पारित झाले तर तो विधानसभेसाठी काळा दिवस असेल. त्यामुळे सभागृहाने सर्वसंमतीने तो रोखला पाहिजे. विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया यांनी  सांगितले की, हा कायदा एकदम चुकीचा आहे. तसेच तो बनवणाऱ्यांनी योग्य पद्धतीने पाहिला नसेल. हा कायदा बालविवाह अधिनियमाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे हा कायदा पारित करणे ही चुक असेल. अपक्ष आमदार संयम लोढा यांनीही हा कायदा करताना जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. बालविवाहाला जस्टिफाय केल्यास देशासमोर चुकीचे उदाहरण ठेवले जाईल, असे सांगितले. दरम्यान, या विधेयकावर उत्तर देताना मंत्री शांती धारीवाल यांनी विरोधी पक्षांनी घेतलेले अनेक आक्षेप खोडून काढले. धारीवाल यांनी हे विधेयक आणण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे असल्याचे सांगितले. २००९ मध्ये केवळ जिल्हा विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद आहे. मात्र यामध्ये अतिरिक्त जिल्हा विवाह रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याची आणि ब्लॉक विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद जोडण्यात आली आहे. विवाह प्रमाणपत्र एक कायदेशीर कागदपत्र आहे आणि विवाहाची नोंदणी झाल्याने विधवा महिलांशी संबंधित आणि उत्तराधिकारा संबंधीचे प्रश्न सोडवणे सोपे जाईल. धारीवाल यांनी सांगितले की, या नोंदणीमुळे बाल विवाह वैध ठरणार नाहीत तर नोंदणीनंतरही कमी वयाच्या विवाहांवर कारवाई केली जाऊ शकेल. अल्पवयीन मुलगीचा विवाह जर झाला तर ती १८ वर्षांची झाल्यावर विवाह रद्द करू शकते. विवाह प्रौढ असो वा अल्पवयीन त्याची नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठीच हे विधेयक आणण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थान