शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

राजस्थानमध्ये बालविवाहाचीही होणार नोंदणी, विरोधी पक्षाच्या गोंधळादरम्यान विधेयक पारित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:21 IST

child marriages: विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले.

जयपूर - विरोधी पक्षाकडून झालेला जोरदार विरोध आणि गोंधळादरम्यान, शुक्रवारी राजस्थानमधील विधानसभेमध्ये विवाह नोंदणी अनिवार्य संशोधन विधेयक २०२१ पारित करण्यात आले. आता राज्यातील प्रत्येक विवाहाची नोंदणी अनिवार्य असेल. मग तो विवाह वैध असो वा अवैध. (child marriages) या विधेयकाबाबतच्या चर्चेदरम्यान, विरोधी पक्षासह अपक्ष आमदार संयम लोढा यांनी त्याला तीव्र विरोध केला. तसेच विधेयकाला जनमत पाहण्यासाठी परिचालित करण्याची मागणी केली. विरोधी पक्षाची मागणी फेटाळून लावत हे विधेयक सभागृहात आवाजी मतदानाने पारित करण्यात आले. त्याला विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेत मत विभाजनाची मागणी केली. मात्र ती फेटाळण्यात आली. अखेर विरोधी पक्षांनी वेलमध्ये उतरून गोंधळ घातला आणि सभागृहातून वॉक आऊट केला. (Rajasthan will also register child marriages, the bill passed amid opposition turmoil)  

विधेयकावरील चर्चेत बोलताना आमदार अशोक लाहोटी यांनी सांगितले की, यावरून असे वाटते की सरकार बाल विवाहाला परवानगी देत आहे. जर हे विधेयक पारित झाले तर तो विधानसभेसाठी काळा दिवस असेल. त्यामुळे सभागृहाने सर्वसंमतीने तो रोखला पाहिजे. विरोधी पक्ष नेते गुलाबचंद कटारिया यांनी  सांगितले की, हा कायदा एकदम चुकीचा आहे. तसेच तो बनवणाऱ्यांनी योग्य पद्धतीने पाहिला नसेल. हा कायदा बालविवाह अधिनियमाचा अवमान करणारा आहे. त्यामुळे हा कायदा पारित करणे ही चुक असेल. अपक्ष आमदार संयम लोढा यांनीही हा कायदा करताना जनतेला विश्वासात घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. बालविवाहाला जस्टिफाय केल्यास देशासमोर चुकीचे उदाहरण ठेवले जाईल, असे सांगितले. दरम्यान, या विधेयकावर उत्तर देताना मंत्री शांती धारीवाल यांनी विरोधी पक्षांनी घेतलेले अनेक आक्षेप खोडून काढले. धारीवाल यांनी हे विधेयक आणण्यामागे अनेक महत्त्वपूर्ण कारणे असल्याचे सांगितले. २००९ मध्ये केवळ जिल्हा विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद आहे. मात्र यामध्ये अतिरिक्त जिल्हा विवाह रजिस्ट्रेशन अधिकाऱ्याची आणि ब्लॉक विवाह नोंदणी अधिकाऱ्याची तरतूद जोडण्यात आली आहे. विवाह प्रमाणपत्र एक कायदेशीर कागदपत्र आहे आणि विवाहाची नोंदणी झाल्याने विधवा महिलांशी संबंधित आणि उत्तराधिकारा संबंधीचे प्रश्न सोडवणे सोपे जाईल. धारीवाल यांनी सांगितले की, या नोंदणीमुळे बाल विवाह वैध ठरणार नाहीत तर नोंदणीनंतरही कमी वयाच्या विवाहांवर कारवाई केली जाऊ शकेल. अल्पवयीन मुलगीचा विवाह जर झाला तर ती १८ वर्षांची झाल्यावर विवाह रद्द करू शकते. विवाह प्रौढ असो वा अल्पवयीन त्याची नोंदणी अनिवार्य आहे. त्यासाठीच हे विधेयक आणण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :marriageलग्नRajasthanराजस्थान