शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

Rajasthan Political Crisis: राजस्थानच्या राजकीय संघर्षात भाजपाची एन्ट्री; “आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 15:12 IST

Rajasthan Political Crisis: भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत.

ठळक मुद्देराजस्थानच्या राजकीय संघर्षात भाजपा सक्रीय भाजपाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक बैठकीत पुढील विचार आणि भूमिका ठरवली जाईल, भाजपा नेत्यांचे विधान

जयपूर – राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भाजपाही सक्रीय होताना दिसत आहे. राजस्थानमध्येभाजपा नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीबाबत भाजपाचे ज्येष्ठ नेते राजेंद्र राठोड यांना विचारलं असता त्यांनी राज्याच्या राजकीय परिस्थितीवर विचारविनीमय करण्यासाठी बैठक होत असल्याचं सांगितलं. तसेच सरकार बनवण्याबाबत विचारलं असता त्यांनी आम्ही साधू नाही, संधी मिळाली तर नक्कीच आमच्या बाजूने वळवू असं सूचक विधान केले आहे.

भाजपाच्या या बैठकीत सतीश पूनिया, गुलाबचंद कटारिया, राजेंद्र राठोड, चंद्रशेखरसह अन्य प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. या बैठकीसोबतच भाजपा पहिल्यांदाच राजस्थानच्या राजकीय संघर्षात उतरल्याचं दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राजस्थानमधील राज्य नेतृत्व केंद्रीय नेतृत्वाच्या संपर्कात राहून प्रत्येक हालचालींबाबत त्यांना माहिती देत आहेत. (Rajasthan Political Crisis)

भाजपा नेते गुलाबचंद कटारिया यांनी सांगितले की, आम्ही सुरुवातीपासून सांगतोय हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आहे. आम्हाला जेव्हा वाटेल आमच्या भूमिकेची गरज आहे, त्यावेळी आम्ही एकत्र बसून चर्चा करु, सध्या राज्यात जे सुरु आहे त्याबाबत भाजपा (BJP) नेत्यांमध्ये बैठक होईल, त्यामध्ये पुढील विचार आणि भूमिका ठरवली जाईल. तसेच जर काँग्रेसला वाटत असेल भाजपा त्यांचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यांनी याची चौकशी करावी, कोणतंही तथ्य नसताना उगाच राजकीय फायद्यासाठी विधानं करु नये असं त्यांनी काँग्रेसला (Congress) बजावलं आहे.

त्याचसोबत काँग्रेसच्या कोणत्याही आमदारासोबत आमची चर्चा नाही, पण अपक्ष आमदारांशी आमची बोलणी सुरु आहेत. राज्यसभा निवडणुकीवेळीही आमची चर्चा झाली होती, त्यात पाप काय? एसओजीच्या जेवढ्या नोटीस काँग्रेसच्या लोकांना मिळाल्या आहेत त्यामुळे हे लोक एकमेकांना भीती दाखवत आहेत असं कटारियांनी सांगितले तर काँग्रेस एका युवा नेतृत्वाकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये वाद सुरु आहेत. काँग्रेसने अशा नेत्याला मुख्यमंत्री बनवले ज्यांना ५ वर्ष कोणीही पाहिले नव्हते. सध्या आम्ही वेट अँन्ड वॉचच्या भूमिकेत आहोत असं भाजपा नेते राजेंद्र राठोड यांनी सांगितले. (Rajasthan Political Crisis)

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलट