शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

अमित शाह यांनी सांगितली पंडित जवाहरलाल नेहरूंची सर्वात मोठी चूक; केला बडा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 11:25 IST

काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते.

भारतीय जनता पक्षाने स्थापनेवेळी जनतेला जी आश्वासने दिली होती, ती सर्व आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहेत. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल 370 लागू करून जी सर्वात मोठी चूक केली होती. ती चूक केंद्रातील मोदी सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी संपुष्टात आणली आणि जम्मू काश्मीरात तिरंगा फडकला, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ते राजस्थानातील जयपूरमध्ये बोलत होते.

शाह म्हणाले, ''भाजप हा एक असा पक्ष आहे, जो नेत्याच्या बळावर नाही, तर बूथवरील आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर निवडणुका जिंकतो. नरेंद्र मोदी यांनी जगात भारताचा डंका वाजविण्याचे काम केले आहे. यामुळे संपूर्ण देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा निवडून पंतप्रधान बनविण्यासाठी तयार आहे.''

सोनिया गांधी आणि मनमोहन सिंगांवरही केलं भाष्य -काँग्रेसला निशाण्यावर घेत अमित शाह म्हणाले, गेल्या दहा वर्षांपूर्वी देशात यूपीए सरकार होते. सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी देशाचे भविष्य अंधकारमय केले होते. 2014 मध्ये देशातील आणि राजस्थानच्या जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचे काम केले आणि 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी देशातील प्रत्येक क्षेत्रात बदल घडवून आणला.

काय म्हणाले अमित शाह? - अमित शाह म्हणाले, 2014 मध्ये 55% मतदानासह 25 च्या 25 जागाही राजस्थानातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिल्या होत्या. त्यानंतर, 2019 मध्ये मतांची टक्केवारी वाढून 61% झाली. पुन्हा सर्वच्या सर्व 25 जागा भाजपला मिळाल्या. आता पुन्हा नरेंद्र मोदी आले आहेत. यावेळी 70% मतांसह 25 च्या 25 ही जागा जिंकून हॅट्रिक लगणार आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Amit Shahअमित शाहBJPभाजपाJawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी