शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Rajasthan Assembly Election: दुखावलेल्या राजपुतांसाठी भाजपाचा 'राम'बाण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 2:57 PM

राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू

जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणूकभाजपासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. या राज्यातील भाजपाची सत्ता जाणार असल्याचं भाकित अनेक सर्वेक्षणांमधून वर्तवण्यात आलं आहे. राज्यातील प्रभावी असलेले राजपूत सध्या भाजपाविरोधात जाताना दिसत आहेत. त्यामुळे आता भाजपानं राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम' बाण बाहेर काढला आहे. राजस्थानात राजपूत समुदाय अतिशय प्रभावी समजला जातो. एकूण लोकसंख्येचा विचार केल्यास, राजपुतांचं प्रमाण 12 टक्के इतकं आहे. जवळपास दोन ते तीन डझन विधानसभा मतदारसंघांमध्ये राजपूतांची मतं निर्णायक ठरु शकतात. वसुंधरा राजे यांच्या कॅबिनेटमध्ये राजपूत समाजाचे तीन आमदार आहेत. तर एकाला राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे. मात्र सध्या राजपूत भाजपावर नाराज आहेत. राजमहल जमीन वाद, पद्मावत चित्रपटाचा वाद, गँगस्टर आनंदपाल सिंहचा एन्काऊंटर, गजेंद्र सिंह शेखावत यांना वसुंधरा राजे यांच्याकडून होणारा विरोध यामुळे राजपुतांच्या मनात नाराजीची भावना आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि राजपूत नेते जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राजपूत समाजाची वाढती नाराजी भाजपाला महागात पडू शकते. त्यामुळे आता भाजपानं 'राम'नामाचा आधार घेण्यास सुरुवात केली. राजपूत समुदायाची संघटना असलेल्या करणी सेनेचे लोकेंद्र सिंह कालवी काल अयोध्येला गेले होते. राम क्षत्रिय होते. त्यामुळे आम्ही रामाचे वंशज आहोत, असं कालवी यांनी म्हटलं. यावेळी कालवी यांनी रामजन्मभूमीचं दर्शन घेतलं. जेव्हा रामाचं भव्य मंदिर उभारण्यात येईल, तेव्हाच अयोध्येला येऊ अशी शपथ त्यांनी घेतली. त्यामुळे आता भाजपाला राजपुतांची नाराजी दूर करण्यासाठी 'राम'बाण उपाय सापडला आहे. रामनामाच्या मदतीनं राजपुतांना खूश करण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात येणार आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकRam Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह