शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 1:17 PM

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सहदेव सहारण नावाच्या शेतकऱ्याच्या तीन मुलींची नुकतीच राजस्थान प्रशासन सेवेत (RAS) निवड झाली आहे. विशेष म्हणजे या तिनही मुली इयत्ता पाचवीनंतर कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांनी राहत्या घरातूनची शिक्षण पूर्ण केलं आहे. कारण वडिलांच्या शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे शाळे पाठविण्यासाठी देखील पैसे सहदेव यांच्याकडे नसायचे. पण त्यांच्या मुलींनी एकमेकींना साथ देत स्वत:च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं आहे. 

सहदेव सहारण यांना एकूण पाच मुली आहेत आणि सध्याच्या घडीला पाचही मुली सरकारी सेवेत कार्यरत आहेत. यातील एक मुलगी झुंझुनूमध्ये बीडीओ पदावर सरकारी सेवेत कार्यरत आहे. तर आता तीन मुलींची आरएएसमध्ये निवड झाली आहे. मुलीला डोक्यावरचं ओझं मानणाऱ्यांसाठी सहदेव यांच्या पाचही मुली आज प्रेरणास्थान ठरत आहेत. मुलींना केव्हाच शिक्षण घेण्यापासून रोखलं नाही, असं सहदेव सांगतात. आरएएसचा निकाल जाहीर झाला आणि तिन्ही बहिणींची निवड झाल्याचं समजल्यानंतर सहारण यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण गावात सहदेव यांच्या मुलींचं कौतुक केलं जात आहे. 

राजस्थान प्रशासकीय सेवा २०१८ (RAS) चे निकाल जाहीर झाले आहेत. यात सहदेव यांच्या अंशु, रितू आणि सुमन या तिनही मुलींची निवड झाली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची मुलाखत प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. यात सहदेव यांच्या तिनही मुलींनी यश प्राप्त केलं आहे. 

सहदेव यांच्या मुलींचं आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनीही कौतुक केलं आहे. "शेतकरी सहदेव सहारण यांच्या पाचही मुली आता आरएएस अधिकारी आहे. काल रितू, अंशु आणि सुमन यांची निवड झाली. तर दोन मुली याआधीपासूनच सरकारी सेवेत आहेत. सहारण कुटुंब आणि संपूर्ण गावासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे", असं ट्विट प्रवीण कासवान यांनी केलं आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRajasthanराजस्थान