Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:31 IST2025-06-09T12:30:51+5:302025-06-09T12:31:57+5:30
Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
शिलाँगमध्ये हनिमूनला गेलेल्या राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्याने कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं होतं. धक्कादायक बाब म्हणजे राजाची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशीनेच केली आहे. सोनमला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने सर्वांनीच मोठा धक्का बसला. यानंतर आता राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
"जर सोनमने आमच्या मुलाला मारलं असेल तर तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी. कोणती पत्नी सांगेल की जा आणि चेन घेऊन या. सोनमनेच प्लॅन केलेला असणार. ज्यांना पकडण्यात आलं आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे. लग्नानंतर घरात सोनमचं वागणं खूपच चांगलं होतं. ती असं काही करू शकते यावर आमचा अजूनही विश्वासच बसत नाही" असं राजाच्या आईने म्हटलं आहे.
VIDEO | Indore Couple Case: Here's what Raja Raghuvanshi’s mother Uma Raghuvanshi claims, “Those responsible should get the death penalty. If Sonam did this, then she too should be punished. Sonam always behaved well with us - we still can’t believe she could have done this... We… pic.twitter.com/RN9SvBacZ9
— Press Trust of India (@PTI_News) June 9, 2025
सोनमच्या कॉल रेकॉर्डवरून असं दिसून आलं आहे की, ती राज कुशवाह या तरुणाशी तासनतास बोलत होती. यावर उमा रघुवंशी म्हणाल्या की, त्यांना याबद्दल काहीही माहिती नाही. घरात कोणालाही कल्पना नव्हती की सोनमसोबत दुसरं कोणीतरी बोलत आहे. राजालाही याबद्दल काहीच माहिती नव्हती. जर त्याला माहिती असतं तर त्याने मला आधीच सांगितलं असतं.
सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
२२ मे रोजी हे जोडपे नोंगरियाट गावातील शिप्रा होमस्टे येथे राहिलं. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता चेक आउट केलं आणि तेव्हापासून दोघांचेही मोबाईल बंद होते.सोनमचं आधीच दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि त्यामुळे तिने पती राजाला मारण्याचा कट रचण्यात आला. राजाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून शिलाँगला नेण्यात आलं, जिथे त्याची सुनियोजित पद्धतीने हत्या करण्यात आली. राजा रघुवंशी आणि सोनमचं ११ मे रोजी इंदूरमध्ये हिंदू रितीरिवाजानुसार लग्न झालं. कुटुंब आनंदी होतं. २० मे रोजी दोघेही शिलाँगला हनिमूनसाठी निघाले. २३ ला राजाची हत्या करण्यात आली.