शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:29 IST

Heavy Rain In Northeast India: ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली असून, पूरस्थितीमुळे बहुतांश भाग पाण्याखाली घेला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मान्सून लवकर आल्याने नुकसान झाले आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुवाहाटीमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

तर अरुणाचल प्रदेशणध्ये दोन कुटुंबांमधील सात जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे त्यांची कार रस्त्यावरून वाहून गेली. हा अपघात पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ वर घडला. सेप्पा येथे जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यात त्यांची कार वाहून गेली आणि दरीत कोसळली. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला.

मेघालयमध्ये मागच्या २४ तासांत भूस्खलन, बुडल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. तर नागालँडमधील चुमौकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे कडा कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये मागच्या २४ तासांत सह जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे.

हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे.    

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश