शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
3
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
4
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
5
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
6
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
7
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
9
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
10
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
11
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
12
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
13
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
14
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
15
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
16
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
17
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
18
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
19
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
20
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल

ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:29 IST

Heavy Rain In Northeast India: ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली असून, पूरस्थितीमुळे बहुतांश भाग पाण्याखाली घेला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मान्सून लवकर आल्याने नुकसान झाले आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुवाहाटीमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

तर अरुणाचल प्रदेशणध्ये दोन कुटुंबांमधील सात जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे त्यांची कार रस्त्यावरून वाहून गेली. हा अपघात पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ वर घडला. सेप्पा येथे जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यात त्यांची कार वाहून गेली आणि दरीत कोसळली. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला.

मेघालयमध्ये मागच्या २४ तासांत भूस्खलन, बुडल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. तर नागालँडमधील चुमौकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे कडा कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये मागच्या २४ तासांत सह जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे.

हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे.    

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश