शहरं
Join us  
Trending Stories
1
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
2
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
3
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
4
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
5
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
6
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
7
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
8
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
9
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
10
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
11
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
12
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
13
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
14
“भारतात राहणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची देशाला गरज”; राहुल गांधींचे परदेश दौरे अन् भाजपाची टीका
15
तिरुपती मंदिरात ‘शाल’ घोटाळा, १०० रुपयांचं पॉलिस्टर १४०० रुपयांचं रेशीम असल्याचं सांगून विकलं  
16
‘तुम्हाला स्वप्नात पाहिलंय, कॉल करा ना?’, महिला DSP चं मधाळ चॅट आणि करोडपती झाला कंगाल
17
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये कधी मिळणार?; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
18
चेहऱ्यावरचा नॅचरल ग्लो वाढवण्यासाठी दररोज किती पाणी प्यावं? डर्मेटोलॉजिस्टने दिलं अचूक उत्तर
19
गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद
20
बाजार सलग तिसऱ्या दिवशी कोसळला! फेड रिझर्व्हच्या धास्तीने १.०९ लाख कोटींचे नुकसान; काय आहे कारण?
Daily Top 2Weekly Top 5

ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:29 IST

Heavy Rain In Northeast India: ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली असून, पूरस्थितीमुळे बहुतांश भाग पाण्याखाली घेला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मान्सून लवकर आल्याने नुकसान झाले आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुवाहाटीमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

तर अरुणाचल प्रदेशणध्ये दोन कुटुंबांमधील सात जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे त्यांची कार रस्त्यावरून वाहून गेली. हा अपघात पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ वर घडला. सेप्पा येथे जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यात त्यांची कार वाहून गेली आणि दरीत कोसळली. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला.

मेघालयमध्ये मागच्या २४ तासांत भूस्खलन, बुडल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. तर नागालँडमधील चुमौकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे कडा कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये मागच्या २४ तासांत सह जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे.

हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे.    

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश