शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन मंत्री संतापला, भारताला म्हणाला, माफी मागा...; PM नरेंद्र मोदींसमोर ठेवल्या ४ अटी
2
"गणपती दरम्यान मुंबईत स्फोट घडवणार", लष्कर-ए-जिहादीच्या नावाने केलेला मेसेज! आरोपीला पोलिसांनी केली अटक
3
काय आहे 'Bharat Taxi', काय आहे त्याबाबत मोठी अपडेट? Ola-Uber ची झोप उडणार, तुम्हाला फायदा
4
"विश्वासघातकी बदलणार नाहीत...", निवडणुकीपूर्वी भाजपाला धक्का; NDA तून आणखी एक मित्रपक्ष बाहेर पडला
5
'ऑपरेशन सिंदूर'चे ८८ तास... लष्करप्रमुख 'पडद्यामागची गोष्ट' सांगत म्हणाले- "त्या वेळी..."
6
VIDEO: उब्जेकिस्तानची Robiya Havasguruhi भारतात तुफान VIRAL, जगभरातून होतंय कौतुक; कारण...
7
बॅलेट पेपरवर आगामी निवडणुका घेणार; कर्नाटक सरकारचा निर्णय
8
देशभरात एकाच वेळी लागू होणार SIR, वादविवादादरम्यान निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
9
ट्रम्प टॅरिफमुळे GST मध्ये बदल केला का? अर्थमंत्र्यांचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, "गेल्या दीड वर्षांपासून..."
10
Asia Cup 2025 : टीम इंडिया दुबईत पोहचली; आशियातील किंग होण्यासाठी ICC अकादमीत कसून सराव
11
"हिरोईन मटेरियल तू वाटत नाहीस...", असं म्हणत अभिनेत्रीला मालिकेतून दाखवला बाहेरचा रस्ता
12
उमेश कामत-प्रिया बापटच्या यशस्वी संसाराचं रहस्य काय? म्हणाले, "आम्ही वैयक्तिक स्तरावर..."
13
Anil Chauhan: चीनसोबतचा सीमावाद हे सर्वांत मोठे आव्हान; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे वक्तव्य
14
यमुनेच्या पुराने अर्धी दिल्ली पाण्यात; नोएडा, गाझियाबादमध्ये स्थिती बिकट
15
अल्काराझ-सिनर जोडीसमोर निभाव लागेना! प्रत्येक वेळी दोघांपैकी एक येतोय जोकोच्या आडवा
16
‘सीसीएमपी’ अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना दिलासा, होमिओपॅथी डॉक्टर ‘एमएमसी’मध्ये नोंद करू शकणार
17
Viral Video : पोर्शमध्ये आई तर फॉर्च्युनरमध्ये मुलगा, रस्त्यावर लागली भन्नाट रेस! व्हिडीओ बघून व्हाल थक्क
18
घोड्यांचे रक्त पाजून ब्राझीलच्या फॅक्टरीत दररोज तयार केले जातात कोट्यवधी मच्छर; कारण काय?
19
ते ‘ट्रम्प’ आणि हे ‘पिपाण्या’…एवढाच काय तो फरक; भाजपानं उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक कौतुक करताच पंतप्रधान मोदी यांनीही मानले आभार! म्हणाले...

ईशान्य भारतात पावसाचा कहर, भूस्खलनासह विविध कारणांनी ३२ जणांचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2025 12:29 IST

Heavy Rain In Northeast India: ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

ईशान्य भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, मागच्या २४ तासांमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी घरं कोसळली असून, पूरस्थितीमुळे बहुतांश भाग पाण्याखाली घेला आहे. आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये मान्सून लवकर आल्याने नुकसान झाले आहे.

आसाममध्ये मुसळधार पावसामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. आसाममधील लखीमपूर जिल्ह्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर गुवाहाटीमध्ये पाच जण मृत्युमुखी पडले आहेत. त्यात तीन मुलांचा समावेश आहे. बोंडा परिसरात झालेल्या भूस्खलनामुळे गाडले जाऊन त्यांचा मृत्यू झाला.

तर अरुणाचल प्रदेशणध्ये दोन कुटुंबांमधील सात जणांचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. भूस्खलनामुळे त्यांची कार रस्त्यावरून वाहून गेली. हा अपघात पूर्व कामेंग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. १३ वर घडला. सेप्पा येथे जात असताना अचानक भूस्खलन झाले आणि त्यात त्यांची कार वाहून गेली आणि दरीत कोसळली. तर लोअर सुबनसिरी जिल्ह्यात दोन मजुरांचा मृत्यू झाला.

मेघालयमध्ये मागच्या २४ तासांत भूस्खलन, बुडल्यामुळे आणि वीज कोसळल्यामुळे ३ मुलांसह ७ जणांचा मृत्यू झाला. तर नागालँडमधील चुमौकेदिमा जिल्ह्यात भूस्खलनामुळे कडा कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या डंपरला आदळल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मिझोराममध्ये मागच्या २४ तासांत सह जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात म्यानमारच्या तीन नागरिकांचा समावेश आहे.

हवामान खात्याने पुढच्या २४ तासांमध्ये पूर्वोत्तर भारतातील बहुतांश भागांमध्ये पावसाची तीव्रता कमी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. मात्र बहुतांश लोकांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा करत पुढील परिस्थितीचा सामना करण्याची तयारी केली आहे.    

टॅग्स :RainपाऊसfloodपूरAssamआसामArunachal Pradeshअरुणाचल प्रदेश