शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

रेल्वेडब्यांची निविदा रद्द, चीनला दणका; मेक इन इंडियालाच देणार प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 03:13 IST

रेल्वे खात्याचा कठोर निर्णय, हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली.

नवी दिल्ली : वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड ट्रेनचे ४४ डबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांची प्रक्रिया रेल्वेखात्याने रद्द केली आहे. चिनी कंपनीचा संयुक्त प्रकल्प असलेल्या सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या कंपनीने या कामासाठी निविदा भरली होती व तिला हे काम मिळण्याची शक्यता होती. हे लक्षात येताच सारी निविदा प्रक्रियाच रद्द करून भारताने पुन्हा एकदा चीनला दणका दिला आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनच्या लष्कराबरोबर १५ जून रोजी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली. चीनला धडा शिकविण्यासाठी भारताने त्या देशातील कंपन्यांना दिलेली काही कंत्राटे रद्द केली. ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यानंतरचे पुढचे पाऊल म्हणून आता वंदे भारत रेल्वेच्या डबेनिर्मितीची निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. देशात आता मेक इन इंडियाच्या तत्त्वाला प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वेखात्याने म्हटले आहे की, वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या ४४ डब्यांच्या निर्मितीसाठी नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया आठवडाभराच्या आत सुरू केली जाईल. हे रेल्वेडबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांमध्ये विदेशातून सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या एकमेव कंपनीची निविदा प्राप्त झाली होती. चीनमधील सीआरसीसी योंगजी इलेक्ट्रिकल कंपनी व गुरुग्राममधील पायोनियर फिल-मेड कंपनी या दोघांनी मिळून ही संयुक्त कंपनी सुरू केली आहे.हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनचे डबे बनविण्यासाठी चेन्नईतील इंडियन रेल्वे इंटेग्रल कोच फॅक्टरीनेही १० जुलै रोजी निविदा भरली होती.थर्मल कॅमेराची निविदाही केली रद्दकोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल कॅमेरा खरेदी करण्याकरिता निविदा मागविण्याची सुरू केलेली प्रक्रियाही रेल्वेखात्याने १ जुलै रोजी रद्द केली होती. या निविदा प्रक्रियेचे निकष चिनी कंपनीसाठी फायदेशीर आहेत, असा आरोप काही भारतीय कंपन्यांनी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत