शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

रेल्वेडब्यांची निविदा रद्द, चीनला दणका; मेक इन इंडियालाच देणार प्राधान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 03:13 IST

रेल्वे खात्याचा कठोर निर्णय, हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली.

नवी दिल्ली : वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड ट्रेनचे ४४ डबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांची प्रक्रिया रेल्वेखात्याने रद्द केली आहे. चिनी कंपनीचा संयुक्त प्रकल्प असलेल्या सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या कंपनीने या कामासाठी निविदा भरली होती व तिला हे काम मिळण्याची शक्यता होती. हे लक्षात येताच सारी निविदा प्रक्रियाच रद्द करून भारताने पुन्हा एकदा चीनला दणका दिला आहे.

पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात चीनच्या लष्कराबरोबर १५ जून रोजी झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनविरोधात भारतामध्ये संतापाची लाट उसळली. चीनला धडा शिकविण्यासाठी भारताने त्या देशातील कंपन्यांना दिलेली काही कंत्राटे रद्द केली. ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. त्यानंतरचे पुढचे पाऊल म्हणून आता वंदे भारत रेल्वेच्या डबेनिर्मितीची निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. देशात आता मेक इन इंडियाच्या तत्त्वाला प्राधान्य दिले जाणार आहे. रेल्वेखात्याने म्हटले आहे की, वंदे भारत योजनेच्या अंतर्गत सेमी-हायस्पीड रेल्वेगाड्यांच्या ४४ डब्यांच्या निर्मितीसाठी नव्याने निविदा मागविण्याची प्रक्रिया आठवडाभराच्या आत सुरू केली जाईल. हे रेल्वेडबे बनविण्यासाठी जागतिक स्तरावर मागविलेल्या निविदांमध्ये विदेशातून सीआरसीसी पायोनियर इलेक्ट्रिक या एकमेव कंपनीची निविदा प्राप्त झाली होती. चीनमधील सीआरसीसी योंगजी इलेक्ट्रिकल कंपनी व गुरुग्राममधील पायोनियर फिल-मेड कंपनी या दोघांनी मिळून ही संयुक्त कंपनी सुरू केली आहे.हे ४४ रेल्वेडबे बनविण्याचे कंत्राट चीनशी संबंधित कंपनीला मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली व ही निविदा प्रक्रियाच रद्द करण्यात आली. वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनचे डबे बनविण्यासाठी चेन्नईतील इंडियन रेल्वे इंटेग्रल कोच फॅक्टरीनेही १० जुलै रोजी निविदा भरली होती.थर्मल कॅमेराची निविदाही केली रद्दकोरोना स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी थर्मल कॅमेरा खरेदी करण्याकरिता निविदा मागविण्याची सुरू केलेली प्रक्रियाही रेल्वेखात्याने १ जुलै रोजी रद्द केली होती. या निविदा प्रक्रियेचे निकष चिनी कंपनीसाठी फायदेशीर आहेत, असा आरोप काही भारतीय कंपन्यांनी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला होता.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत