शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रेल्वेचा गलथान कारभार चव्हाट्यावर, प्रवाशाला रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज; 25 हजाराचा दंड  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 2:16 PM

अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.

नवी दिल्ली:  प्रवाशाला चुकीचा मेसेज पाठवणं आयआरसीटीसीला चांगलंच महागात पडलं आहे. त्यामुळे प्रवाशाला 25 हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ग्राहक मंचाने याबाबत आदेश दिला आहे. त्यामुळे रेल्वेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. 29 मे रोजी अलाहाबादवरुन दिल्लीला जाणारी महाबोधी एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मेसेज रेल्वेकडून प्रवाशांना पाठवण्यात आला होता.  ‘तिकिटाचे पैसे हवे असल्यास तिकीट रद्द करा,’ असा मेसेज रेल्वेकडून करण्यात आल्याने अनेक प्रवाशांनी तिकीट रद्द केले.  वैशाली येथे राहणाऱ्या विजयप्रताप सिंह यांचा मुलगा अक्षत अलाहाबादवरुन दिल्लीला जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करणार होता. रेल्वे रद्द झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांनी तिकीट रद्द केले. मुलाला जाणं गरजेचं असल्यामुळे त्याच्यासाठी कॅब बुक केली. मुलगा दिल्लीला पोहोचल्यावर त्याला धक्काच बसला. कारण महाबोधी एक्स्प्रेस रद्द न झाल्याचे त्याला समजले. महाबोधी एक्स्प्रेस वेळेवर दिल्लीला पोहोचल्याची माहिती त्याला मिळाली. विशेष म्हणजे, विजयप्रताप सिंह  तिकीट रद्द करण्यास गेले असता केवळ एकाच तिकीटाचे पैसे त्यांना परत मिळाले. दुसरे तिकीट तत्काळमधील असल्याने रेल्वेने तिकिटाचे पैसे देण्यास नकार दिला, असे सिंह यांनी सांगितले. त्यानंतर सिंह यांनी ग्राहक मंचाकडे धाव घेतली. अखेर  रेल्वेच्या भोंगळ कारभारामुळे सिंह यांना, शारिरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला, अशा शब्दांमध्ये ग्राहक मंचाने सिंह यांना 25 हजार रुपयांची भरपाई देण्याचे आदेश चुकीचा मेसेज पाठवणा-या आयआरसीटीसीला दिले आहेत.   

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेIRCTCआयआरसीटीसी