शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Rahul Gandhi: ...तेव्हा प्रेम कुठं होतं? राहुल गांधींना पत्र लिहून भाजपा नेत्यांचा बोचरा सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 19:43 IST

Rahul Gandhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये द्वेष पसवरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षानं प्रेमाचं दुकान सुरू केलं आहे, असा दावा केला होता. आता या मुद्द्यावरून भाजपाच्या तीन नेत्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अमेरिका दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये द्वेष पसवरत असल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षानं प्रेमाचं दुकान सुरू केलं आहे, असा दावा केला होता. आता या मुद्द्यावरून भाजपाच्या तीन नेत्यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यवर्धनसिंह राठोड, पूनम महाजन आणि प्रवेश वर्मा यांनी राहुल गांधी यांना नऊ पानांचं पत्र लिहून त्यांना आरसा दाखवला आहे. तसेच मनेका गांधी आणि चुलत भाऊ वरुण गांधी यांच्यासोबत केलेल्या वर्तनाचा उल्लेख करत भाजपा खासदारांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

भाजपा खासदारांनी आपल्या पत्रात लिहिलं की, राहुल गांधी जी, तुम्हाला कदाचित २८ मार्च १९८२ हा दिवस कदाचित आठवत असेल. हा तोच दिवस आहे ज्या दिवशी तुमच्या आजी इंदिरा गांधी त्यांच्या धाकट्या सुनबाई मनेका गांधी यांच्यासोबत एवढ्या प्रेमाने वागल्या होत्या. की, त्यांना मध्यरात्री थेट घरातून बाहेर काढलं होतं. तेव्हा देशातील तमाम वृत्तपत्रांनी हा फोटो पहिल्या पानवर छापली होती. त्यात अश्रू ढाळत असलेल्या मनेका गांधी आणि त्यांच्यासोबत छोटा वरुण गांधी होता. जो त्या दिवशी तापानं फणफणत होता.

भाजपा खासदारांनी इथे खुशवंत सिंग यांचा उल्लेख केला. खुशवंत सिंग यांनी त्यांच्या ‘Truth, Love & a Little Malice’ मध्ये या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख केला होता. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मनेका गांधी जिथे जाणार असतील तिथे त्यांना सोडून या असे आदेश त्यांच्या ड्रायव्हरला दिले होते. एवढंच नाही तर वरुण गांधी यांच्या लग्नालाही राहु गांधी आणि त्यांच्या कुटुंबातील कुणी गेलं नव्हतं, याची आठवणही भाजपा खासदारांनी पत्रामधून राहुल गांधी यांना करून दिली आहे. तुम्ही प्रेमाचं दुकान चालवल्याचं सांगता. मात्र प्रेमाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे, हे तुमच्या वैयक्तिक नात्यांमधून चांगल्या पद्धतीनं समोर येतं. 

तुमचे बंधू वरुण गांधी हे लग्नाचं निमंत्रण घेऊन सोनिया गांधींच्या निवासस्थानी गेले होते. मात्र प्रेमाचं नातं निभावण्यासाठी तुम्ही, तुमची आई आणि बहीण वरुण गांधी यांच्या लग्नात सहभागी झाला नाहीत. मात्र वरुण गांधी सर्व अपमान विसरून प्रियंका गांधी यांच्या विवाहात सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या भाजपा खासदारांनी काँग्रेसच्या काळात झालेल्या दंगलींचाही उल्लेख करत त्याची आठवण राहुल गांधी यांना करून दिली. तसेच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत काँग्रेसने केलेल्या वर्तनाचाही उल्लेख या पत्रात केला.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपा