शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मोदींनी सेल्फीचं बटण दाबलं की चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते, राहुल गांधींचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2017 13:42 IST

'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते', अशी टीका राहुल गांधींनी केली आहे

ठळक मुद्देगुजरातमधील भरुच येथे झालेल्या सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडलं'मोदींच्या एका सेल्फीमुळे चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते''चीनमध्ये दररोज 50 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियामध्ये दिवसाला फक्त 450 तरुणांना रोजगार मिळतो''8 नोव्हेंबरला मोदींनी सर्वात मोठी चूक केली, पण ते मान्य करण्यास तयार नाहीत'

भरुच - गुजरातमध्ये राजकीय वातारवण तापण्यास सुरुवात झाली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपला करंट लागणार आहे असा टोला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी लगावला आहे. भरुच येथे झालेल्या सभेदरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टिकास्त्र सोडलं. वर्ल्ड बँकेच्या क्रमवारीत भारताची स्थिती सुधारण्यावरुन राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना टोला लगावत म्हटलं की, मोदींच्या एका सेल्फीमुळे चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. राहुल गांधी यांनी 'मेक इन इंडिया'वरही टीका केली असून, भारतीय तरुणांना रोजगार मिळत नसल्याचं म्हटलं आहे. 

राहुल गांधी बोलले आहेत की, 'चीनसोबत स्पर्धा सुरु असतानाही देशात मेड इन चायना सुरु आहे. आपल्या मोबाइवरुन मोदी जेव्हा सेल्फी घेण्यासाठी बटण दाबतात, तेव्हा चीनमधील एका तरुणाला नोकरी मिळते. चीनमध्ये दररोज 50 हजार तरुणांना रोजगार दिला जात आहे. मात्र नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियामध्ये दिवसाला फक्त 450 तरुणांना रोजगार मिळतो. संपुर्ण वर्षभरात भाजपा सरकार फक्त एक लाख तरुणांना रोजगार देऊ शकलं आहे. हेच सत्य आहे, आणि हेच भाजपाचं विकास मॉडेल आहे'.

यावेळी राहुल गांधींनी नोटाबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावरुनही पंतप्रधान मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था नष्ट केली, जीडीपी 2 टक्क्यांनी खाली आणला. 8 नोव्हेंबरला मोदींनी सर्वात मोठी चूक केली, पण ते मान्य करण्यास तयार नाहीत अशी टीका राहुल गांधींनी केली. जीएसटी आणि नोटाबंदीने छोटे व्यवसाय नष्ट केले असं राहुल गांधी बोलले आहेत. भरुचमध्ये आपल्या तीन दिवसांच्या दौ-याला सुरुवात करत असताना राहुल गांधींनी मोदी सरकावर निशाणा साधत उद्योगपतींना फायदा पोहोचवला जात असल्याचा आरोप केला. 

'समाजातील प्रत्येक वर्ग त्रस्त आहे. आता फक्त उद्योगपतीच आहेत ज्यांना कोणताच त्रास नाही. त्यांना सरकारचं पुर्ण समर्थन मिळालं आहे. ते काहीच बोलत नाहीत, त्यांना कोणतीच समस्या नाही, ते कोणतंही आंदोलन करत नाहीत. इथे जनता नोटाबंदी आणि जीएसटीमुळे त्रस्त आहे', असं राहुल गांधी बोलले आहेत. 

यावेळ राहुल गांधींना काळा पैसा भारतात आणण्यासाठी दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली. 'भाजपाला सरकार तीन वर्षांपासून सत्तेत आहे. पण  स्विस बँकेत खातं असणारे कितीजण जेलमध्ये आहेत ? एक नाव सांगा ज्याला मोदींनी जेलमध्ये टाकलं आहे. विजय मल्ल्या देशाबाहेर बसून मजा करत आहे', असा टोला राहुल गांधींनी लगावला. काळ्या पैशाविरोधात कारवाई केली, मग तो पैसा सर्वसामान्य जनतेला का मिळाला नाही? तो पैसा गेला कुठे? असे प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केले. 

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेसGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017BJPभाजपा