शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राहुल गांधींनी दिलेला शब्द पाळला; छत्तीसगडमध्येही शेतकऱ्यांचे कर्ज माफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 22:29 IST

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात हे दोन्ही निर्णय घेतल्याची घोषणा केली.

रायपूर : छत्तीसगडमध्ये सत्ता आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले होते. मात्र, निकालाच्या दिवशी त्यांनी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत विरोधकांकडून ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल करण्यात आले होते. अखेर छत्तीसगडमध्ये राहुल यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता नव्या मुख्यमंत्र्यांनी केली असून मक्याची आधारभूत किंमत 1700 रुपयांवरून 2500 रुपये प्रती क्विंटल करण्यात आली आहे. 

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासात हे दोन्ही निर्णय घेतल्याची घोषणा केली. याचबरोबर झिराम घाटीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या रॅलीवरील हल्ल्याच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येणार असल्याचेही बघेल यांनी सांगितले. या नक्षलवादी हल्ल्यामध्ये वरिष्ठ नेते नंदकुमार पटेल यांच्यासह 29 जण ठार झाले होते. या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही. 

मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच कमलनाथ यांनी पहिला सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसनं निवडणूक प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. यानंतर कमलनाथ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं आहे. 

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसnaxaliteनक्षलवादीFarmerशेतकरी