शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:21 IST

गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाहीदेशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजेराहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान घाटी.परिसरात चिनी सैनिकांचे अतिक्रमण रोखताना भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने संपूर्ण देशात संतप्त वातावरण आहे. जनता वीर जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान घाटीत झालेल्या झटापटीवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता भाजपानेहीराहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

लडाखमध्ये आपल्या जवानांना धोक्याच्या ठिकाणी निशस्त्र जाण्यास कुणी आणि का सांगितले होते. या जवानांच्या बलिदानाला कोण जबाबदार आहे असा सवाल  राहुल गांधी यांनी विचारला होता. दरम्यान, त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाही. देशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजे, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

राहुल गांधी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राहुलजी तुम्ही अपरिपक्वपणे वर्तन करत आहात, तसेच देशाच्या पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापरही करत आहात. ही बाब खूप बेजबाबदारपणाची आणि दु:खद आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेत त्याबाबत वाचन केले पाहिजे, असा सल्ला संबित पात्रा यांंनी दिला. तसेच राहुल गांधी यांनी उद्यापर्यंत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीची वाट पाहिली पाहिजे होती, असेही पात्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतladakhलडाख