शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:21 IST

गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाहीदेशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजेराहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान घाटी.परिसरात चिनी सैनिकांचे अतिक्रमण रोखताना भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने संपूर्ण देशात संतप्त वातावरण आहे. जनता वीर जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान घाटीत झालेल्या झटापटीवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता भाजपानेहीराहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

लडाखमध्ये आपल्या जवानांना धोक्याच्या ठिकाणी निशस्त्र जाण्यास कुणी आणि का सांगितले होते. या जवानांच्या बलिदानाला कोण जबाबदार आहे असा सवाल  राहुल गांधी यांनी विचारला होता. दरम्यान, त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाही. देशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजे, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

राहुल गांधी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राहुलजी तुम्ही अपरिपक्वपणे वर्तन करत आहात, तसेच देशाच्या पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापरही करत आहात. ही बाब खूप बेजबाबदारपणाची आणि दु:खद आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेत त्याबाबत वाचन केले पाहिजे, असा सल्ला संबित पात्रा यांंनी दिला. तसेच राहुल गांधी यांनी उद्यापर्यंत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीची वाट पाहिली पाहिजे होती, असेही पात्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतladakhलडाख