शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

राहुल गांधी अपरिपक्व आणि बेजबाबदार; त्या विधानावरून भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 15:21 IST

गलवानमध्ये बलिदान दिलेल्या वीर जवानांना जनता साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे.

ठळक मुद्देराहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाहीदेशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजेराहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा

नवी दिल्ली - लडाखमधील गलवान घाटी.परिसरात चिनी सैनिकांचे अतिक्रमण रोखताना भारताच्या २० जवानांना वीरमरण आल्याने संपूर्ण देशात संतप्त वातावरण आहे. जनता वीर जवानांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देत आहे. मात्र दुसरीकडे राजधानी दिल्लीत राजकीय आरोप प्रत्यारोपांना उत आला आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गलवान घाटीत झालेल्या झटापटीवरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर आता भाजपानेहीराहुल गांधींना टीकेचे लक्ष्य केले आहे. 

लडाखमध्ये आपल्या जवानांना धोक्याच्या ठिकाणी निशस्त्र जाण्यास कुणी आणि का सांगितले होते. या जवानांच्या बलिदानाला कोण जबाबदार आहे असा सवाल  राहुल गांधी यांनी विचारला होता. दरम्यान, त्याला आता भाजपाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी या परिस्थितीतसुद्धा जबाबदारीने वागत नाही आहेत. त्यांना लष्करावर विश्वास नाही. देशाची दिशाभूल करण्याचे राजकारण राहुल गांधी यांनी सोडले पाहिजे, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

राहुल गांधी यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, राहुलजी तुम्ही अपरिपक्वपणे वर्तन करत आहात, तसेच देशाच्या पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापरही करत आहात. ही बाब खूप बेजबाबदारपणाची आणि दु:खद आहे. तसेच राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या काळात चीनसोबत झालेल्या करारांचा अभ्यास करावा, लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेचा फायदा घेत त्याबाबत वाचन केले पाहिजे, असा सल्ला संबित पात्रा यांंनी दिला. तसेच राहुल गांधी यांनी उद्यापर्यंत होणाऱ्या सर्वपक्षीय बैठकीची वाट पाहिली पाहिजे होती, असेही पात्रा यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाIndiaभारतladakhलडाख